बाजार समित्यांवर व्यापाऱ्यांचाच ताबा

By Admin | Updated: February 10, 2016 03:01 IST2016-02-10T03:01:46+5:302016-02-10T03:01:46+5:30

शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे.

Merchants control over market committees | बाजार समित्यांवर व्यापाऱ्यांचाच ताबा

बाजार समित्यांवर व्यापाऱ्यांचाच ताबा

बेभाव बोली : किनवट, कारंजा तेज, पण यवतमाळात मंदी
रूपेश उत्तरवार यवतमाळ
शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. यावर उपाय न झाल्याने स्थिती हाताबाहेर गेली. तूर आणि कापूस उत्पादकांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. याचवेळी जिल्ह्यालगतच्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर वधारलेले आहे. यवतमाळच्या बाजारात मात्र, मंदीची लाट आहे.
जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अपेक्षित पीक झाले नाही. कसेबसे घरात असलेले धान्य शेतकऱ्यांनी विकायला काढले. याच सुमारास बाजारात धान्याची बोली घसरली. कापूस आणि तुरीच्या दरात कमी बोली लावली. कापसाचा खुल्या पद्धतीने लिलाव झाला नाही. यामुळे कापसाला यवतमाळात २०१५-२०१६ ला चांगले दर मिळाले नाही. मात्र अमरावती, राळेगाव, हिंगणघाट, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रूपयांनी अधिक आहे. तुरीच्या बाबतीत असेच घडले.
इतर बाजारापेक्षा यवतमाळचे दर ५०० रूपयाने कमी राहीले आहे. इतर ठिकाणी तुरीची बोली ८००० रूपये क्विंटलपासून सुरू होते. तर यवतमाळात तुरीची बोली ७ हजार ५०० रूपये क्विंटलपासून सुरू होते.

नाफेडची खुली बोली का नाही?
कृत्रिम तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाने नाफेडच्या मदतीने तुरीची खरेदी सुरू केली आहे. शेतमालाचे दर पडू नये, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे, असा यामागचा उद्देश आहे. मात्र यवतमाळात खुली बोली बोलण्याचा अधिकार नाफेडच्या खरेदीदारांना नाही. इतर केंद्रांवर मात्र नाफेड खुल्या पद्धतीने तुरीची खरेदी करीत आहे. यवतमाळवरच हा अन्याय का, हा संशोधनाचा विषय आहे.

तीन महिन्यात तूर तीन हजारांनी घसरली
तुरडाळीचे वाढलेले दर स्थिर करण्यासाठी केंद्राने तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ५६ लाख मेट्रीक टन विदेशी डाळ देशात दाखल होणार आहे. ही डाळ स्थानिक बाजारात येताच दर घसरणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी त्यापूर्वीच भाव घसरविणे सुरू केले आहे. यामुळे तीन महिन्यात तुरीचे दर क्विंटलमागे तीन हजारांनी घसरले आहेत. ११ हजार २०० रूपये क्विंटलची तूर ८ हजार ८०० पर्र्यंत खाली आली आहे.

Web Title: Merchants control over market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.