शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भूमाफियांच्या फरारीतच ‘मास्टर मार्इंड’ इन्टरेस्टेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:59 IST

कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत.

ठळक मुद्देअटक होऊ नये म्हणून धडपड : नावे रेकॉर्डवर येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. या भीतीतूनच मास्टर मार्इंडची राकेशवर नजर असून तो कोणत्याही परिस्थितीत अटक होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न आहे. सुदैवाने त्यांच्या या प्रयत्नांना ‘एसआयटी’चीही भरभरुन साथ मिळते आहे, हे विशेष.भूखंड घोटाळ्यात सात गुन्हे दाखल झाले. त्यात राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे आरोपी आहेत. त्यातही भूखंड घोटाळ्याची सर्वाधिक गुंतागुंत ही राकेशसोबत जुळली आहेत. एकदा राकेश पोलिसांच्या ताब्यात आल्यास या घोटाळ्यातील सर्व संबंधितांची नावे पोलिसांनी ‘प्रामाणिकपणे’ तपास केल्यास रेकॉर्डवर येऊ शकतात. हीच भीती या घोटाळ्यातील मास्टर मार्इंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवैध सावकार, बोगस मालकीवर कोट्यवधींचे कर्ज मंजूर करणारे बँकांचे अधिकारी-पदाधिकारी, क्रिकेट सट्टा-जुगार क्लब चालविणारे सटोडिये आणि त्या सर्वांना ‘भागीदारी’च्या माध्यमातून घरातूनच राजकीय आशीर्वाद उपलब्ध करून देणारी ‘प्रतिष्ठीत’ मंडळी आदींना आहे. त्यामुळेच काहीही झाले तरी राकेश पोलिसांच्या हाती लागू नये, असाच त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.म्हणे, राकेशच्या फरारीतच भलाईतो फरार राहण्यातच या मास्टर मार्इंडची भलाई असल्याने त्याला यवतमाळपासून दूर, वेळ प्रसंगी राज्याबाहेर कदाचित मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशात त्याला आश्रयाला ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राकेशला अनेक वर्ष फरारच ठेऊन प्रकरण शांत ठेवण्याची मास्टर मार्इंडची व्युहरचना आहे.बँक एजंट करतोय सावकारी!बोगस मालकीचे भूखंड तारण ठेऊन त्यावर बँकांनी केलेल्या कर्ज मंजुरीतील अनेक बारकावेही पुढे येत आहे. तीन कोटींच्या एका प्रकरणात बँकेच्या रेकॉर्डवर एजंट असलेला राहूल प्रत्यक्षात लाखो रुपयांची सावकारी करीत असून व्यापाऱ्यांना पैसा पुरवितो. या कर्जाची परतफेड एजंटाकडील खात्यातून केली गेली. त्याचे पैसेही विशिष्ट व्यक्तीकडून भरले जात होते. मशीनमधील डेटा तपासल्यास पोलिसांना मास्टर मार्इंडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.‘बाजीराव’ केव्हा बरसणार?पोलिसांचा ‘बाजीराव’ बँक अधिकाऱ्यांचे तोंड सहज उघडू शकतो. केवळ त्यासाठी पोलिसांचे ‘प्राामणिक’ प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती व कर्तव्यदक्षतेची तेवढी गरज आहे. आतापर्यंतच्या ‘एसआयटी’च्या तपासात तरी याबाबी दिसून आल्या नाही. किमान या पुढील तपासात तरी त्या दिसतील, अशी अपेक्षा यवतमाळकर नागरिक ठेऊन आहेत. बँकांनी फसवणूक होऊनही अद्याप पोलिसात न दिलेल्या तक्रारी यातच बँकांची यंत्रणा बोगस कर्ज प्रकरणात आकंठ बुडाल्याचे सिद्ध करीत आहे.आदिवासींची शंभर एकर जमीन घशात, धामणगाव रोडवर अधिकभूमाफियांचे मास्टर मार्इंड असलेले व समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरणाऱ्यांनी भागीदारीत यवतमाळ शहराच्या चहूबाजूने आदिवासींची शंभर एकरापेक्षा अधिक जमीन ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आपल्या मर्जीतील आदिवासींच्याच नावावर ही जमीन खरेदी केली गेली. महाराज, तरुण असे काही या जमिनीत भागीदार आहेत. धामणगाव रोडवरील घाटाच्या डाव्या बाजूला यातील काही जमीन आहे. समोर वनजमीन व मागे आदिवासींची जमीन आहे. ती २५ ते ३० लाख रुपये एकराचा भाव असताना अवघ्या चार ते पाच लाखात हडपली गेली आहे. त्यासाठी भाईगिरीची दहशतही निर्माण केली गेली.बँक अधिकाऱ्यांना बोलते करा ना...या कर्ज प्रकरणात बँकांच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी बोलते केल्यास कर्जासाठी नेमका कुणी दबाव टाकला, हे उघड होण्यास वेळ लागणार नाही. या कर्ज प्रकरणाने कुणाला नोकरी सोडावी लागली तर कुणाला तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. या कर्ज प्रकरणाचे काही पुरावे रवीकडे असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस