शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भूमाफियांच्या फरारीतच ‘मास्टर मार्इंड’ इन्टरेस्टेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:59 IST

कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत.

ठळक मुद्देअटक होऊ नये म्हणून धडपड : नावे रेकॉर्डवर येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. या भीतीतूनच मास्टर मार्इंडची राकेशवर नजर असून तो कोणत्याही परिस्थितीत अटक होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न आहे. सुदैवाने त्यांच्या या प्रयत्नांना ‘एसआयटी’चीही भरभरुन साथ मिळते आहे, हे विशेष.भूखंड घोटाळ्यात सात गुन्हे दाखल झाले. त्यात राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे आरोपी आहेत. त्यातही भूखंड घोटाळ्याची सर्वाधिक गुंतागुंत ही राकेशसोबत जुळली आहेत. एकदा राकेश पोलिसांच्या ताब्यात आल्यास या घोटाळ्यातील सर्व संबंधितांची नावे पोलिसांनी ‘प्रामाणिकपणे’ तपास केल्यास रेकॉर्डवर येऊ शकतात. हीच भीती या घोटाळ्यातील मास्टर मार्इंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवैध सावकार, बोगस मालकीवर कोट्यवधींचे कर्ज मंजूर करणारे बँकांचे अधिकारी-पदाधिकारी, क्रिकेट सट्टा-जुगार क्लब चालविणारे सटोडिये आणि त्या सर्वांना ‘भागीदारी’च्या माध्यमातून घरातूनच राजकीय आशीर्वाद उपलब्ध करून देणारी ‘प्रतिष्ठीत’ मंडळी आदींना आहे. त्यामुळेच काहीही झाले तरी राकेश पोलिसांच्या हाती लागू नये, असाच त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.म्हणे, राकेशच्या फरारीतच भलाईतो फरार राहण्यातच या मास्टर मार्इंडची भलाई असल्याने त्याला यवतमाळपासून दूर, वेळ प्रसंगी राज्याबाहेर कदाचित मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशात त्याला आश्रयाला ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राकेशला अनेक वर्ष फरारच ठेऊन प्रकरण शांत ठेवण्याची मास्टर मार्इंडची व्युहरचना आहे.बँक एजंट करतोय सावकारी!बोगस मालकीचे भूखंड तारण ठेऊन त्यावर बँकांनी केलेल्या कर्ज मंजुरीतील अनेक बारकावेही पुढे येत आहे. तीन कोटींच्या एका प्रकरणात बँकेच्या रेकॉर्डवर एजंट असलेला राहूल प्रत्यक्षात लाखो रुपयांची सावकारी करीत असून व्यापाऱ्यांना पैसा पुरवितो. या कर्जाची परतफेड एजंटाकडील खात्यातून केली गेली. त्याचे पैसेही विशिष्ट व्यक्तीकडून भरले जात होते. मशीनमधील डेटा तपासल्यास पोलिसांना मास्टर मार्इंडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.‘बाजीराव’ केव्हा बरसणार?पोलिसांचा ‘बाजीराव’ बँक अधिकाऱ्यांचे तोंड सहज उघडू शकतो. केवळ त्यासाठी पोलिसांचे ‘प्राामणिक’ प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती व कर्तव्यदक्षतेची तेवढी गरज आहे. आतापर्यंतच्या ‘एसआयटी’च्या तपासात तरी याबाबी दिसून आल्या नाही. किमान या पुढील तपासात तरी त्या दिसतील, अशी अपेक्षा यवतमाळकर नागरिक ठेऊन आहेत. बँकांनी फसवणूक होऊनही अद्याप पोलिसात न दिलेल्या तक्रारी यातच बँकांची यंत्रणा बोगस कर्ज प्रकरणात आकंठ बुडाल्याचे सिद्ध करीत आहे.आदिवासींची शंभर एकर जमीन घशात, धामणगाव रोडवर अधिकभूमाफियांचे मास्टर मार्इंड असलेले व समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरणाऱ्यांनी भागीदारीत यवतमाळ शहराच्या चहूबाजूने आदिवासींची शंभर एकरापेक्षा अधिक जमीन ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आपल्या मर्जीतील आदिवासींच्याच नावावर ही जमीन खरेदी केली गेली. महाराज, तरुण असे काही या जमिनीत भागीदार आहेत. धामणगाव रोडवरील घाटाच्या डाव्या बाजूला यातील काही जमीन आहे. समोर वनजमीन व मागे आदिवासींची जमीन आहे. ती २५ ते ३० लाख रुपये एकराचा भाव असताना अवघ्या चार ते पाच लाखात हडपली गेली आहे. त्यासाठी भाईगिरीची दहशतही निर्माण केली गेली.बँक अधिकाऱ्यांना बोलते करा ना...या कर्ज प्रकरणात बँकांच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी बोलते केल्यास कर्जासाठी नेमका कुणी दबाव टाकला, हे उघड होण्यास वेळ लागणार नाही. या कर्ज प्रकरणाने कुणाला नोकरी सोडावी लागली तर कुणाला तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. या कर्ज प्रकरणाचे काही पुरावे रवीकडे असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस