बाजार समितीत शेतकर्‍याला मारहाण

By Admin | Updated: May 24, 2014 23:58 IST2014-05-24T23:58:57+5:302014-05-24T23:58:57+5:30

येथील बाजार समितीच्या धान्य बाजार यार्डात हरभरा विक्रीस आणणार्‍या एका शेतकर्‍यास हरभरा खरेदी करणार्‍या एजन्सीच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या बाबत तिघांविरोधात गुन्हे

Marketers beat up the farmer | बाजार समितीत शेतकर्‍याला मारहाण

बाजार समितीत शेतकर्‍याला मारहाण

घाटंजी : येथील बाजार समितीच्या धान्य बाजार यार्डात हरभरा विक्रीस आणणार्‍या एका शेतकर्‍यास हरभरा खरेदी करणार्‍या एजन्सीच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या बाबत तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

जरूर येथील संजय महादेव जीवतोडे या शेतकर्‍याने १२ मे रोजी २५७ कट्टे हरभरा घाटंजी बाजार समितीमध्ये विक्रीस आणला. त्या दिवशी ग्रेडरने ग्रेडींग करून तो पास केला. म्हणून जीवतोडेनी तो हरभरा बाजार समितीमध्ये ठेवला. मालाचा काटा आज होईल. उद्या होईल या आशेने तो येथे चकरा मारू लागला. या सोबत इतर शेतकर्‍यांचासुद्धा माल होता. या सर्व ५0-६0 कास्तकारांनी माल केव्हा खरेदी करणार म्हणून २0 मे मंगळवारी उठाव केला व सहाय्यक निबंधकास बोलाविले. त्यावेळी सचिवाने खरेदी करण्याची परवानगी १९ मे सोमवारपर्यंतच होती, असे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसापासून येथे पडून असलेला हरभरा का खरेदी केला नाही, या प्रश्नाला सचिव व प्रशासक उत्तर देवू शकले नाही.

निबंधकांनी त्वरित हरभरा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर एक-दोन दिवसाची मुदत वाढवून खरेदीस प्रारंभ झाला. २१ मे रोजी रंजित बोबडे यांनी जीवतोडे यांना हरभरा गाळण्यास सांगितले. हरभरा मजूर लावून गाळण्यात आला. नंतर त्या हरभर्‍यात डाळ आहे, असे कारण देत तो खरेदी करण्यास नकार दिला. यातून वाद झाला.

जीवतोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रंजित बोबडे (५0) यांनी थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा मुलगा रितेश (१९) याने अलि शिवीगाळ करून मारहाण केली. तर नीलेश प्रकाश हांडे (३५) यांनी दगडाने खांद्यावर व उजव्या चाळ्यावर मारले. त्यामुळे संजय जीवतोडे जखमी झाले. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून भादंवि ३२४, २१९, ५0४, ५0६, ३४ नुसार वरील तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी येथील रंजित बोबडे यांच्या विकास गंगा संस्थेअंतर्गत नवजीवन आणि यशोधरा अँग्रो प्रॉड्स कंपनीतर्फे दिली. येथील एसएएफसी नोडल कंपनीसाठी हरभरा खरेदी करीत होती. परंतु २१ मे रोजी दुपारनंतर पुन्हा खरेदी बंद झाली असून अजूनही बाजार यार्डात सातशे ते आठशे क्विंटल हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकरी हवालदिल झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Marketers beat up the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.