शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बाजार समितीचे गतवैभव नष्ट

By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST

येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही.

नीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही. यापूर्वी येथील बाजार समिती परिसरात प्रसिध्द होती. येथे परिसरातील शेतकरी बांधव मोठय़ा प्राणामात आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मोठय़ा प्रमाणात या बाजार समितीत तूर, ज्वारी, चना विक्रीसाठी यायचा. त्यामुळे बाजार समिती गजबजून राहायची. बाजार समितीच्या प्रांगणात बैलंडी, वाहनांची गर्दी दिसायची. परिणामी रात्री दोन वाजतापर्यंत काटा सुरू राहायचा. मात्र आता येथील काही हमालांच्या लुटीमुळे आणि काही व्यापार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे, बाजार समितीचे गतवैभव नष्ट होत आहे.येथील व्यापार्‍यांनी आता शेतकर्‍यांचा विश्‍वासच गमविला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता आपला शेतमाल पाटणबोरी येथे न आणता हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद येथे तो विक्रीस नेत आहेत. बाजार समितीचे अनेक गोदामही संरक्षणाअभावी पडीत आहे. त्यांना संरक्षण नसल्याने तूर व चना खरेदीधारक गोदामात माल ठेवत नाही. बाजार समितीचे गोदाम गावाबाहेर असल्याने नेहमी तेथे चोर्‍याही होतात. त्यामुळे हे गोदाम असुरक्षित झाले आहे. तेथे व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही आपला माल ठेवणे कठीण झाले आहे.बाजार समितीच्या पाण्याच्या मोटारपंपावर कर्मचार्‍याचे नियंत्रण नाही. त्यामुळे येथील पाण्याचा वापर परिसरातील नागरिक भांडे, कपडे धुणे, दुचाकी, चारचाकी वाहन धुण्याकरिता करीत असतात. उपबाजार समितीचा दूरध्वनी तर नेहमीच बंद असतो. तो कधीच लागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी माहिती कुणाकडे विचारावयाची, असा प्रश्न पडतो.  उपबाजार समितीच्या परिसरात कुणीही भटकत नसल्याने हा परिसर आता अवैध व्यवसायाचे केंद्रस्थान बनला आहे. व्यापारीही परस्परच खरेदी करीत असल्याने शेतकरी बाजार समितीत येत नाही. त्यासाठी व्यापार्‍यांनी गावात ठिकठिकाणी आपले खरेदीचे ठिय्ये तयार केले आहे. तेथेच ते शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे समितीच्या ‘सेस’चे प्रचंड नुकसान होते. बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना प्रति गाडी थोडी ‘चिरीमिरी’ देऊन व्यापार्‍यांनी बाहेरच शेतमाल खरेदीचा अधिकार मिळविल्याने बाजार समिती ओस पडत आहे. व्यापारी परस्पर खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल ‘झिरो’मध्येच खरेदी केला जातो. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चे लाखो रूपयांचे नुकसान होते. त्यातून केवळ व्यापारीच गब्बर बनत आहे. शेतकरी मात्र लुटला जात आहे. बळीराजा या सर्व बाबींमुळे हतबल झाला आहे. मात्र त्याला नाईलाजाने सर्व बाबी सहन कराव्या लागत आहे. बाजार समिती व्यवस्थापनाचे व्यापार्‍यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकरीच भाव व वजन फरकाने नागविला जात असून त्यांची एक प्रकारे ‘लूट’ सुरू आहे.