शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बाजार समितीचे गतवैभव नष्ट

By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST

येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही.

नीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही. यापूर्वी येथील बाजार समिती परिसरात प्रसिध्द होती. येथे परिसरातील शेतकरी बांधव मोठय़ा प्राणामात आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मोठय़ा प्रमाणात या बाजार समितीत तूर, ज्वारी, चना विक्रीसाठी यायचा. त्यामुळे बाजार समिती गजबजून राहायची. बाजार समितीच्या प्रांगणात बैलंडी, वाहनांची गर्दी दिसायची. परिणामी रात्री दोन वाजतापर्यंत काटा सुरू राहायचा. मात्र आता येथील काही हमालांच्या लुटीमुळे आणि काही व्यापार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे, बाजार समितीचे गतवैभव नष्ट होत आहे.येथील व्यापार्‍यांनी आता शेतकर्‍यांचा विश्‍वासच गमविला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता आपला शेतमाल पाटणबोरी येथे न आणता हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद येथे तो विक्रीस नेत आहेत. बाजार समितीचे अनेक गोदामही संरक्षणाअभावी पडीत आहे. त्यांना संरक्षण नसल्याने तूर व चना खरेदीधारक गोदामात माल ठेवत नाही. बाजार समितीचे गोदाम गावाबाहेर असल्याने नेहमी तेथे चोर्‍याही होतात. त्यामुळे हे गोदाम असुरक्षित झाले आहे. तेथे व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही आपला माल ठेवणे कठीण झाले आहे.बाजार समितीच्या पाण्याच्या मोटारपंपावर कर्मचार्‍याचे नियंत्रण नाही. त्यामुळे येथील पाण्याचा वापर परिसरातील नागरिक भांडे, कपडे धुणे, दुचाकी, चारचाकी वाहन धुण्याकरिता करीत असतात. उपबाजार समितीचा दूरध्वनी तर नेहमीच बंद असतो. तो कधीच लागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी माहिती कुणाकडे विचारावयाची, असा प्रश्न पडतो.  उपबाजार समितीच्या परिसरात कुणीही भटकत नसल्याने हा परिसर आता अवैध व्यवसायाचे केंद्रस्थान बनला आहे. व्यापारीही परस्परच खरेदी करीत असल्याने शेतकरी बाजार समितीत येत नाही. त्यासाठी व्यापार्‍यांनी गावात ठिकठिकाणी आपले खरेदीचे ठिय्ये तयार केले आहे. तेथेच ते शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे समितीच्या ‘सेस’चे प्रचंड नुकसान होते. बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना प्रति गाडी थोडी ‘चिरीमिरी’ देऊन व्यापार्‍यांनी बाहेरच शेतमाल खरेदीचा अधिकार मिळविल्याने बाजार समिती ओस पडत आहे. व्यापारी परस्पर खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल ‘झिरो’मध्येच खरेदी केला जातो. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चे लाखो रूपयांचे नुकसान होते. त्यातून केवळ व्यापारीच गब्बर बनत आहे. शेतकरी मात्र लुटला जात आहे. बळीराजा या सर्व बाबींमुळे हतबल झाला आहे. मात्र त्याला नाईलाजाने सर्व बाबी सहन कराव्या लागत आहे. बाजार समिती व्यवस्थापनाचे व्यापार्‍यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकरीच भाव व वजन फरकाने नागविला जात असून त्यांची एक प्रकारे ‘लूट’ सुरू आहे.