शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे.

ठळक मुद्देनिकालाने रेकॉर्ड मोडले : वणी ८२.०१, मारेगाव ७९.६६, झरी ९२.०३, पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९०

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला़ यावर्षी तोंडी परीक्षेचे गुण पुन्हा बहाल केल्याने निकालावर पुन्हा सूज आल्याचे दिसून येत आहे. जवळपास बहुतांश शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. वणी उपविभागातून मारेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे, तर पांढरकवडा तालुक्याने झरी उपविभागात बाजी मारली आहे.बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे. सर्वच तालुक्यांचा निकाल मागील वर्षीपेक्षा वाढला आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वाढ झाली आहे. अनेक विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सर्वच पेपर संपल्यानंतर राज्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे पेपर तपासणीसाठी अडथळे निर्माण झाले होते. परिणामी निकाल दोन महिने उशिरा लागला. वणी तालुक्याचा बारावीचा निकाल ८२.०१ टक्के लागला. तालुक्यातून दोन हजार ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी एक हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची सुवर्णा किसनराव हनुमंते हिने मिळविला असून तिला ९०.४६ टक्के गुण मिळाले आहेत.मारेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ७९.६६ टक्के लागला आहे़ तालुक्यातून ९४४ विद्यार्थी बसले. त्यांपैकी ७५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून मारेगाव येथील कला-वाणिज्य महाविद्यालयातील वैशाली संजय सिडाम ही विद्यार्थीनी तालुक्यातून प्रथम आली. तिला ८४.१५ टक्के गुण मिळाले आहेत. झरीजामणी तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०३ टक्के लागला आहे़ ६५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांपैकी ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुकूटबन येथील मातोश्री पुनकाबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राज अनिल पारखी हा झरी तालुक्यातून प्रथम आला असून त्याने ८५.०७ टक्के गुण मिळविले. पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९० टक्के लागला़ एक हजार ७०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपैकी एक हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून जिल्हा परिषद माजी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा तुषार शरद काळे हा ८६ टक्के गुण घेऊन प्रथम आला.१० शाळांचा निकाल लागला १०० टक्केउपविभागातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणीतील हाजी शिराजुद्दीन कॉलेज राजूर व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी, झरीमधून शासकीय ज्युनिअर कॉलेज शिबला, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण, पांढरकवडामधून सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय वाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भाडउमरी व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय पांढरकवडाची विज्ञान शाखा, मारेगावातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी विज्ञान शाखा व जीवन विकास विद्यालय मारेगाव, या महाविद्यालयांचा समावेश आहे.प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणारयावर्षी बारावीचा विज्ञान, कला व वाणिज्य तिनही शाखांचा निकाल रेकॉर्डब्रेक लागल्याने चारही तालुक्यात प्रथम वर्षाच्या उपलब्ध जागा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणार असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे अधिक कल असतो. परंतु बीएससी प्रथम वर्षाचे चारही तालुक्यात मोजकेच वर्ग असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बीएससीला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता लागली आहे. हीच परिस्थिती कला व वाणिज्य शाखेमध्येही होणार आहे. शासनाला प्रथम वर्षाच्या अधिक जागा निर्माण करून द्याव्या लागणार आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल