शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे.

ठळक मुद्देनिकालाने रेकॉर्ड मोडले : वणी ८२.०१, मारेगाव ७९.६६, झरी ९२.०३, पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९०

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला़ यावर्षी तोंडी परीक्षेचे गुण पुन्हा बहाल केल्याने निकालावर पुन्हा सूज आल्याचे दिसून येत आहे. जवळपास बहुतांश शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. वणी उपविभागातून मारेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे, तर पांढरकवडा तालुक्याने झरी उपविभागात बाजी मारली आहे.बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे. सर्वच तालुक्यांचा निकाल मागील वर्षीपेक्षा वाढला आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वाढ झाली आहे. अनेक विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सर्वच पेपर संपल्यानंतर राज्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे पेपर तपासणीसाठी अडथळे निर्माण झाले होते. परिणामी निकाल दोन महिने उशिरा लागला. वणी तालुक्याचा बारावीचा निकाल ८२.०१ टक्के लागला. तालुक्यातून दोन हजार ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी एक हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची सुवर्णा किसनराव हनुमंते हिने मिळविला असून तिला ९०.४६ टक्के गुण मिळाले आहेत.मारेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ७९.६६ टक्के लागला आहे़ तालुक्यातून ९४४ विद्यार्थी बसले. त्यांपैकी ७५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून मारेगाव येथील कला-वाणिज्य महाविद्यालयातील वैशाली संजय सिडाम ही विद्यार्थीनी तालुक्यातून प्रथम आली. तिला ८४.१५ टक्के गुण मिळाले आहेत. झरीजामणी तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०३ टक्के लागला आहे़ ६५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांपैकी ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुकूटबन येथील मातोश्री पुनकाबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राज अनिल पारखी हा झरी तालुक्यातून प्रथम आला असून त्याने ८५.०७ टक्के गुण मिळविले. पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९० टक्के लागला़ एक हजार ७०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपैकी एक हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून जिल्हा परिषद माजी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा तुषार शरद काळे हा ८६ टक्के गुण घेऊन प्रथम आला.१० शाळांचा निकाल लागला १०० टक्केउपविभागातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणीतील हाजी शिराजुद्दीन कॉलेज राजूर व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी, झरीमधून शासकीय ज्युनिअर कॉलेज शिबला, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण, पांढरकवडामधून सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय वाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भाडउमरी व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय पांढरकवडाची विज्ञान शाखा, मारेगावातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी विज्ञान शाखा व जीवन विकास विद्यालय मारेगाव, या महाविद्यालयांचा समावेश आहे.प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणारयावर्षी बारावीचा विज्ञान, कला व वाणिज्य तिनही शाखांचा निकाल रेकॉर्डब्रेक लागल्याने चारही तालुक्यात प्रथम वर्षाच्या उपलब्ध जागा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणार असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे अधिक कल असतो. परंतु बीएससी प्रथम वर्षाचे चारही तालुक्यात मोजकेच वर्ग असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बीएससीला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता लागली आहे. हीच परिस्थिती कला व वाणिज्य शाखेमध्येही होणार आहे. शासनाला प्रथम वर्षाच्या अधिक जागा निर्माण करून द्याव्या लागणार आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल