शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आओ गुरू, करे पोर्टल शुरू..! गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भावी गुरुजींचा मोर्चा

By अविनाश साबापुरे | Updated: July 3, 2023 15:40 IST

राज्यभरातील बेरोजगार यवतमाळात एकवटले

यवतमाळ : अभियोग्यता परीक्षेला पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही सरकारने पवित्र पोर्टल सुरू केलेले नाही. शिक्षक भरतीच्या काहीही हालचाली दिसत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या डीएड, बीएडधारक बेरोजगारांनी सोमवारी यवतमाळात महाआक्रोश मोर्चा काढला. ‘आओ गुरू करे पवित्र पोर्टल शुरू’ असे नारे देत या युवक-युवतींनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. ऐन गुरुपौर्णिमेच्याच दिवशी भावी गुरुजींना नोकरीसाठी मोर्चा काढावा लागल्याने जनमानसात संताप व्यक्त होत होता. 

सोमवारी सकाळी ११ वाजता येथील शिवाजी मैदानात डीएड, बीएडधारक बेरोजगार युवक-युवती एकत्र आले. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा शिवाजी मैदान ते आर्णी मार्ग असा फिरत दुपारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. ‘नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, ‘खूप झाल्या गप्पा आता ५५ हजार शिक्षक भरतीचा एकच टप्पा’, ‘शिक्षक भरती करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा करत हा मोर्चा निघाला. यवतमाळसह हिंगोली, अहमदनगर, चंद्रपूर, जालना, गडचिरोली, बीड अशा विविध जिल्ह्यातून यावेळी बेरोजगार तरुण या मोर्चासाठी यवतमाळात एकवटले होते. यामध्ये महिला बेरोजगार उमेदवारांचीही मोठी संख्या होती. विशेष म्हणजे काही महिला तर आपल्या तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मोर्चा जिल्हा परिषदेपुढे पोहोचल्यावर प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. एकाच टप्प्यात ५५ हजार शिक्षक पदे भरण्यात यावी, त्यासाठी तातडीने पवित्र पोर्टल सुरू करण्यात यावे, विविध परीक्षांसाठी घेतले जाणारे अव्वाच्या सव्वा शुल्क कमी करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. येथील प्रशांत मोटघरे, सचिन राऊत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

किती वेळा सिद्ध करायची पात्रता?

आम्ही २०१७ मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा दिली. त्यानंतर २०२३ मध्येही अभियोग्यता परीक्षा दिली. दोन दोन वेळा आमची पात्रता सिद्ध झालेली असतानाही सरकार अजूनही शिक्षक भरती करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे नेमक्या किती परीक्षा पास झाल्यावर आम्ही शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहोत, असा संतप्त सवाल यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या अभियोग्यताधारकांनी उपस्थित केला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकUnemploymentबेरोजगारीagitationआंदोलनYavatmalयवतमाळ