शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:18 IST

पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देमोटरपंप नादुरस्त : ४० गावांतील नागरिकांचे हाल, कृत्रिम पाणीटंचाई

बालाप्रसाद सोडगिर ।लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा : पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे. मोटरपंप जळाल्याचे कारण सांगितले जात असले तरी वर्षभरही ही योजना रखडतच सुरू असते. परिणामी सणासुदीच्या काळात महिलांसह पुरुषांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पुसद तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कित्येक वर्षांपासून कुप्रसिद्ध आहे. या भागातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी ४० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून योजना सुरू झाली. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोपजवळ जॉकवेल आहे. तर फेट्रा गावात जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण केंद्र आहे. या ठिकाणाहून माळपठारातील ४० गावांना पाणीपुरवठा होतो. यासाठी गावागावांत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहे. परंतु गत पाच-सहा वर्षांपासून ही योजना अखेरच्या घटका मोजत आहे. अधिकाºयांना विचारले तर वसुलीचे कारण पुढे करतात. गावकºयांना विचारले तर वेळेवर पाणीच मिळत नाही, पाणपट्टी द्यायची कशी, असा प्रश्न उपस्थित करतात. वसुली होत नसल्याने दुरुस्ती होत नाही. परिणामी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.अलिकडे योजनेचे पाणी आठ दिवसाआड दिले जात होते. कागदोपत्री रोजच पाणीपुरवठा होत असल्याचे दाखविले जाते. १५ दिवसांपासून पाण्याचा एक थंबही माळपठारात आला नाही. त्यामुळे मारवाडी, रोहडा, बेलोरा, केदारलिंग, बेलोरा बु., वाडी, वागजाळी, मांजरजवळा, म्हैसमाळ, पन्हाळा या गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. दिवाळीसारख्या सणातही नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळाले नाही. गावालगतच्या विहिरी आणि बोअरवेलवरून पाणी आणावे लागते. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने योजनेच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली, त्यावेळी मोटरपंप जळाल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. सध्या नागरिक आॅटोरिक्षा, सायकल, बैलगाडीने दोन-दोन किलोमीटरहून पाणी आणताना दिसत आहे.वसुलीच्या काळात मुबलक पाणीपाणीपट्टीच्या वसुलीकाळात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मुबलक पाणी गावकºयांना दिले जाते. वसुलीसाठी जाताना नागरिकांनी संतप्त होवू नये म्हणून हा फंडा वापरला जातो. इतर काळात मात्र पाण्याचा थेंबही येत नाही. ऐन उन्हाळ्यातही पाणी मुबलक सोडले जाते. वसुलीकाळात पाणी कोठून येते, असा प्रश्न नागरिकांना कायम सतावत आहे.विकतचे पाणीपाणीपुरवठा बंद असल्याने या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. अनेक वाहनचालकांनी पाणी विकण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. मालवाहू वाहनात टाक्या ठेवून गावोगाव ही मंडळी पाणी विकत आहे. याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी तर मजुरी बुडते आणि विकत पाणी घ्यावे तर पैसे नाही, अशा अवस्थेत ही मंडळी राहात आहे. पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.