शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:18 IST

पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देमोटरपंप नादुरस्त : ४० गावांतील नागरिकांचे हाल, कृत्रिम पाणीटंचाई

बालाप्रसाद सोडगिर ।लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा : पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे. मोटरपंप जळाल्याचे कारण सांगितले जात असले तरी वर्षभरही ही योजना रखडतच सुरू असते. परिणामी सणासुदीच्या काळात महिलांसह पुरुषांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पुसद तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कित्येक वर्षांपासून कुप्रसिद्ध आहे. या भागातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी ४० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून योजना सुरू झाली. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोपजवळ जॉकवेल आहे. तर फेट्रा गावात जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण केंद्र आहे. या ठिकाणाहून माळपठारातील ४० गावांना पाणीपुरवठा होतो. यासाठी गावागावांत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहे. परंतु गत पाच-सहा वर्षांपासून ही योजना अखेरच्या घटका मोजत आहे. अधिकाºयांना विचारले तर वसुलीचे कारण पुढे करतात. गावकºयांना विचारले तर वेळेवर पाणीच मिळत नाही, पाणपट्टी द्यायची कशी, असा प्रश्न उपस्थित करतात. वसुली होत नसल्याने दुरुस्ती होत नाही. परिणामी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.अलिकडे योजनेचे पाणी आठ दिवसाआड दिले जात होते. कागदोपत्री रोजच पाणीपुरवठा होत असल्याचे दाखविले जाते. १५ दिवसांपासून पाण्याचा एक थंबही माळपठारात आला नाही. त्यामुळे मारवाडी, रोहडा, बेलोरा, केदारलिंग, बेलोरा बु., वाडी, वागजाळी, मांजरजवळा, म्हैसमाळ, पन्हाळा या गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. दिवाळीसारख्या सणातही नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळाले नाही. गावालगतच्या विहिरी आणि बोअरवेलवरून पाणी आणावे लागते. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने योजनेच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली, त्यावेळी मोटरपंप जळाल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. सध्या नागरिक आॅटोरिक्षा, सायकल, बैलगाडीने दोन-दोन किलोमीटरहून पाणी आणताना दिसत आहे.वसुलीच्या काळात मुबलक पाणीपाणीपट्टीच्या वसुलीकाळात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मुबलक पाणी गावकºयांना दिले जाते. वसुलीसाठी जाताना नागरिकांनी संतप्त होवू नये म्हणून हा फंडा वापरला जातो. इतर काळात मात्र पाण्याचा थेंबही येत नाही. ऐन उन्हाळ्यातही पाणी मुबलक सोडले जाते. वसुलीकाळात पाणी कोठून येते, असा प्रश्न नागरिकांना कायम सतावत आहे.विकतचे पाणीपाणीपुरवठा बंद असल्याने या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. अनेक वाहनचालकांनी पाणी विकण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. मालवाहू वाहनात टाक्या ठेवून गावोगाव ही मंडळी पाणी विकत आहे. याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी तर मजुरी बुडते आणि विकत पाणी घ्यावे तर पैसे नाही, अशा अवस्थेत ही मंडळी राहात आहे. पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.