शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

माळपठार पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:18 IST

पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देमोटरपंप नादुरस्त : ४० गावांतील नागरिकांचे हाल, कृत्रिम पाणीटंचाई

बालाप्रसाद सोडगिर ।लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा : पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळपठार भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गत तीन आठवड्यांपासून ठप्प झाली आहे. मोटरपंप जळाल्याचे कारण सांगितले जात असले तरी वर्षभरही ही योजना रखडतच सुरू असते. परिणामी सणासुदीच्या काळात महिलांसह पुरुषांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पुसद तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कित्येक वर्षांपासून कुप्रसिद्ध आहे. या भागातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी ४० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून योजना सुरू झाली. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोपजवळ जॉकवेल आहे. तर फेट्रा गावात जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण केंद्र आहे. या ठिकाणाहून माळपठारातील ४० गावांना पाणीपुरवठा होतो. यासाठी गावागावांत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहे. परंतु गत पाच-सहा वर्षांपासून ही योजना अखेरच्या घटका मोजत आहे. अधिकाºयांना विचारले तर वसुलीचे कारण पुढे करतात. गावकºयांना विचारले तर वेळेवर पाणीच मिळत नाही, पाणपट्टी द्यायची कशी, असा प्रश्न उपस्थित करतात. वसुली होत नसल्याने दुरुस्ती होत नाही. परिणामी ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.अलिकडे योजनेचे पाणी आठ दिवसाआड दिले जात होते. कागदोपत्री रोजच पाणीपुरवठा होत असल्याचे दाखविले जाते. १५ दिवसांपासून पाण्याचा एक थंबही माळपठारात आला नाही. त्यामुळे मारवाडी, रोहडा, बेलोरा, केदारलिंग, बेलोरा बु., वाडी, वागजाळी, मांजरजवळा, म्हैसमाळ, पन्हाळा या गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. दिवाळीसारख्या सणातही नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळाले नाही. गावालगतच्या विहिरी आणि बोअरवेलवरून पाणी आणावे लागते. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने योजनेच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून विचारणा केली, त्यावेळी मोटरपंप जळाल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. सध्या नागरिक आॅटोरिक्षा, सायकल, बैलगाडीने दोन-दोन किलोमीटरहून पाणी आणताना दिसत आहे.वसुलीच्या काळात मुबलक पाणीपाणीपट्टीच्या वसुलीकाळात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मुबलक पाणी गावकºयांना दिले जाते. वसुलीसाठी जाताना नागरिकांनी संतप्त होवू नये म्हणून हा फंडा वापरला जातो. इतर काळात मात्र पाण्याचा थेंबही येत नाही. ऐन उन्हाळ्यातही पाणी मुबलक सोडले जाते. वसुलीकाळात पाणी कोठून येते, असा प्रश्न नागरिकांना कायम सतावत आहे.विकतचे पाणीपाणीपुरवठा बंद असल्याने या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. अनेक वाहनचालकांनी पाणी विकण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. मालवाहू वाहनात टाक्या ठेवून गावोगाव ही मंडळी पाणी विकत आहे. याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी तर मजुरी बुडते आणि विकत पाणी घ्यावे तर पैसे नाही, अशा अवस्थेत ही मंडळी राहात आहे. पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.