भिक्खू संघातर्फे महावंदना व धम्मदेसना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:59 IST2017-08-31T21:58:55+5:302017-08-31T21:59:10+5:30
अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद यवतमाळच्यावतीने घोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन भदन्त मेत्तानंद थेरो (नागपूर) यांच्या हस्ते झाले.

भिक्खू संघातर्फे महावंदना व धम्मदेसना
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद यवतमाळच्यावतीने घोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन भदन्त मेत्तानंद थेरो (नागपूर) यांच्या हस्ते झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंदजी महास्थवीर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे आयोजक तथा फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धम्ममंचावर भदन्त डॉ. ज्ञानदीप महाथेरो (बुद्धगया), भदन्त प्रा. खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भदन्त उपाली महाथेरो (अमरावती), भदन्त सुमेधबोधी महाथेरो (वटफळी), भदन्त धम्मवंश महाथेरो, भदन्त बुद्धघोश थेरो (नागपूर), भिक्खू उपाली, भदन्त सुमंगल, भदन्त राऊल, भदन्त धम्मदीप, भदन्त ज्ञानरक्षित, भदन्त धम्मकिरण, भदन्त सुबोध, भदन्त अश्वजीत, भदन्त करुणाबोधी, भदन्त धम्मपाल, भिक्खू धम्मपाल, भिक्खू बुद्धशरण, भिक्खू अश्वघोश, भिक्खू धम्मसागर, भिक्खू पूर्णबोधी, भदन्त रठ्ठपाल, भदन्त मेधंकर, भदन्त शिलरत्न, भदन्त सारिपुत्त, आर्या उत्पलवना (श्रीलंका), आर्या रूपनंदा, आर्या प्रजापती, आर्या श्रावस्ती, सुकेशनी, आर्या विशाखा, आर्या उरूवेला, आर्या वैशाली, आर्या कल्याणी आदींची उपस्थिती होती.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास भोयर, पा. वाल्मीक डवरे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, सुनील नगराळे, प्रदीप गवळी, संघपाल कांबळे, महेंद्र देवतळे, संजय कांबळे, देवकुमार शेंडे, सुभाष गोडघाटे, रा.वि. नगराळे, अशोक खरतडे, एम.एस. चांदेकर, अशोक निमसरकर, संतोष जीवने यांची उपस्थिती होती.
बुद्ध अनुयायी म्हणून जीवन जगताना तथागत भगवान बुद्धाने दिलेल्या पारमिता, चार आर्यसत्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा आत्मसात करायला पाहिजे. सुरुवातीला मध्यभागी व अंतीही कल्याणकारी असणारा बुद्ध धम्म परिपूर्ण, परिशुद्ध आणि श्रेष्ठ जीवनाची शिकवण देणारा धम्म आहे. दु:खाचा अंत करणारा धम्म आहे, असे भन्तेंनी धम्मदेसनेतून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भदन्त राहुल व शांतीदूत मुळे यांनी केले. किशोर भगत यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. आभार जितेंद्र खरतडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भास्कर मानकर, रूपक खरतडे, अयुब शेख, वासुदेव खरतडे, प्रवीण लढे, गौतम खरतडे, राजीव खरतडे, अरविंद लढे, मधुकर लढे, सुनील भगत, सचिन कांबळे, विकास खरतडे, गणेश खडसे, नीलेश पाटील, प्रमोद केराम, सुरज गवई, सचिन बन्सोड आदींनी सहकार्य केले.