शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 9:56 PM

येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले.व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.ललित बोरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या दोघांनीही भाषा, धर्म, पंथ याचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे, असे सांगून यासोबतच इतरांच्या भाषा, धर्म, पंथांचा आदरही केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आपली मने जोपर्यंत विस्तृत होत नाही तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची कास धरून आपली मने उन्नत करण्याचा संकल्प करावा, हीच खरी डॉ.आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती करण्यासाठी संविधान दिवस ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम राबविण्यात आले. संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे प्रा. जी.आर. खंडेराव यांनी वाचन केले. याप्रसंगी अशोक खरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी प्रा.जी.आर. खंडेराव, प्रा.ए.एम. मनवर, डॉ.डी.बी. प्रबोधनकार, डॉ.क्षमा कळणावत, प्रा.अंजू फुलझेले, प्रा.किशोर तायडे आदींनी सहकार्य केले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा व प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा यांनी यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

टॅग्स :Amolkchand Collegeअमोलकचंद महाविद्यालयYavatmalयवतमाळ