शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:23 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

यवतमाळ -  लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मात्र तेथून मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

ईव्हीएम हॅक होऊ नये म्हणून स्ट्राँग रुम परिसरात जामर लावण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे ईव्हीएम मोबाईल संपर्कात येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. सुमारे दीड महिना अर्थात २३ मेपर्यंत ईव्हीएम या स्ट्राँग रुममध्ये राहणार असल्याने तेथे जामरसह विविध उपाय योजना कराव्या, ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनातून केली आहे.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारी (11 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले आहे. या मतदानला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस