शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:23 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

यवतमाळ -  लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मात्र तेथून मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

ईव्हीएम हॅक होऊ नये म्हणून स्ट्राँग रुम परिसरात जामर लावण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे ईव्हीएम मोबाईल संपर्कात येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. सुमारे दीड महिना अर्थात २३ मेपर्यंत ईव्हीएम या स्ट्राँग रुममध्ये राहणार असल्याने तेथे जामरसह विविध उपाय योजना कराव्या, ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनातून केली आहे.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारी (11 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले आहे. या मतदानला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस