शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

स्ट्राँग रूममधील ईव्हीएम हॅक होण्याची काँग्रेसला भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:23 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

यवतमाळ -  लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. मात्र तेथून मोबाईलच्या संपर्कात आल्यास हे ईव्हीएम हॅक होण्याची भीती काँग्रेसने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. 

ईव्हीएम हॅक होऊ नये म्हणून स्ट्राँग रुम परिसरात जामर लावण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे ईव्हीएम मोबाईल संपर्कात येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. सुमारे दीड महिना अर्थात २३ मेपर्यंत ईव्हीएम या स्ट्राँग रुममध्ये राहणार असल्याने तेथे जामरसह विविध उपाय योजना कराव्या, ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनातून केली आहे.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला गुरुवारी (11 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले आहे. या मतदानला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश होता. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस