शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

Lok Sabha Election 2019; शेतकरी कन्येच्या लग्नाला ‘आचारसंहिता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 9:37 PM

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे.

ठळक मुद्दे५०० कुटुंबापुढे प्रश्न : सामूहिक मेळाव्याला परवानगी नाकारली

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे. अगदी काही दिवसाआधी मिळालेल्या निरोपामुळे वधू आणि वर मंडळींपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकरी कुटुंबासाठी सामूहिक विवाह मेळावा योजना राबविली जात आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेळाव्यात विवाह करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. विविध संस्थांकडे ५०० शुभमंगल नोंदले गेले. या संस्थांनी काही महिन्यांपूर्वीच नोंदणी झालेल्या जोडप्यांची माहिती प्रशासनाला दिली. यानुसार मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात आली.ठरलेल्या तारखेनुसार वधू-वरांकडील मंडळींनी पत्रिका छापल्या, विविध माध्यमातून निमंत्रण दिले. सर्व तयारी झालेली असतानाच मेळावा होणार नाही, असा निरोप या मंडळींना गेला. आयोजक संस्थांचीही धावपळ सुरू झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला परवानगी नाही, असे प्रशासनाने आयोजक संस्थांना कळविले. वास्तविक आचारसंहितेपूर्वीच आयोजनाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते.चेतना अभियानाची समाप्तीबळीराजा चेतना अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. यानंतर या अभियानाला फुलस्टॉप मिळणार आहे. सामूहिक विवाह मेळावे याच अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी घेतले जात आहे. आता मेळावेच रद्द झाले आहे. अभियानही संपत आहे. त्यामुळे शेतकरी पिता आणि आयोजक संस्थेला अनुदानाला मुकावे लागणार आहे. आचारसंहिता संपेपर्यंत चेतना अभियानाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.वधुपित्याच्या खात्यात १५ हजारसामूहिक विवाह मेळाव्यात शुभमंगल केल्यास वधूपित्याच्या खात्यात १५ हजार रुपये जमा केले जाते. शिवाय संस्थेला दिल्या जाणाऱ्या १५ हजार रुपयातून वधूला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, वधू-वरास कपडे दिले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक