शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Lok Sabha Election 2019; शेतकरी कन्येच्या लग्नाला ‘आचारसंहिता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:40 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे.

ठळक मुद्दे५०० कुटुंबापुढे प्रश्न : सामूहिक मेळाव्याला परवानगी नाकारली

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे. अगदी काही दिवसाआधी मिळालेल्या निरोपामुळे वधू आणि वर मंडळींपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकरी कुटुंबासाठी सामूहिक विवाह मेळावा योजना राबविली जात आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेळाव्यात विवाह करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. विविध संस्थांकडे ५०० शुभमंगल नोंदले गेले. या संस्थांनी काही महिन्यांपूर्वीच नोंदणी झालेल्या जोडप्यांची माहिती प्रशासनाला दिली. यानुसार मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात आली.ठरलेल्या तारखेनुसार वधू-वरांकडील मंडळींनी पत्रिका छापल्या, विविध माध्यमातून निमंत्रण दिले. सर्व तयारी झालेली असतानाच मेळावा होणार नाही, असा निरोप या मंडळींना गेला. आयोजक संस्थांचीही धावपळ सुरू झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला परवानगी नाही, असे प्रशासनाने आयोजक संस्थांना कळविले. वास्तविक आचारसंहितेपूर्वीच आयोजनाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते.चेतना अभियानाची समाप्तीबळीराजा चेतना अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. यानंतर या अभियानाला फुलस्टॉप मिळणार आहे. सामूहिक विवाह मेळावे याच अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी घेतले जात आहे. आता मेळावेच रद्द झाले आहे. अभियानही संपत आहे. त्यामुळे शेतकरी पिता आणि आयोजक संस्थेला अनुदानाला मुकावे लागणार आहे. आचारसंहिता संपेपर्यंत चेतना अभियानाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.वधुपित्याच्या खात्यात १५ हजारसामूहिक विवाह मेळाव्यात शुभमंगल केल्यास वधूपित्याच्या खात्यात १५ हजार रुपये जमा केले जाते. शिवाय संस्थेला दिल्या जाणाऱ्या १५ हजार रुपयातून वधूला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, वधू-वरास कपडे दिले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक