शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

शेतकऱ्यांना कर्जवसुली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तर त्यावरील कर्जासाठी ‘वनटाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत. अतिरिक्त पैसे भरल्यानंतर माफी दिली जाणार होती. त्याकरिता ग्रीन लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नाव ग्रीन लिस्टमध्ये आलेच नाही. यामुळे असे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रक्रियेबाहेर आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी फसली : पीकच आले नाही तर लाखोंची फेड करायची कशी?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत न बसलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यात शेतजमिनीचा हर्रास करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे कुठलेही पीक हातात नसताना कर्जवसुलीच्या आलेल्या नोटीसने शेतकरी हादरले आहेत.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची घोषणा केली. शेवटच्या शेतकºयाचे कर्ज माफ होईपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्याचा दावा करण्यात आला होता.थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तर त्यावरील कर्जासाठी ‘वनटाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत. अतिरिक्त पैसे भरल्यानंतर माफी दिली जाणार होती. त्याकरिता ग्रीन लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नाव ग्रीन लिस्टमध्ये आलेच नाही. यामुळे असे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रक्रियेबाहेर आहेत. आता काही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसूलीच्या नोटीस बजावल्या आहेत. यामुळे शेतकरी हादारले आहेत.चापडोहचे शेतकरी रामकृष्ण हनुमंत वाळवे यांनी २००८ मध्ये ट्रॅक्टरकरीता कर्ज घेतले होते. त्यामध्ये शेती गहान ठेवण्यात आली होती. साडेपाच लाख रूपयांचे हे कर्ज होते. हे कर्ज थकल्याने ट्रॅक्टरचा हर्रास करण्यात आला. यानंतर ९ लाख रूपयांचे कर्ज आहे. असे बँकेने पत्र पाठविले आहे. शेतजमिनीचा हर्रासाचे संकेत दिले आहे. मुळात कुठलेही पीक हातात नाही. जंगली जनावरांचा त्रास वाढला आहे. यातून मार्ग कसा काढावा हा पेच शेतकºयांपुढे आहे. हा शेतकरी स्वता रोजमजूरी करतआहे.खानगावचे शेतकरी श्रीनीवास मुराब आणि प्रेम मुराब यांनी २००८ मध्ये साडेपाच लाखाचे कर्ज घेतले होते. ते आता १८ लाख झाले आहे. ज्या ट्रॅक्टरकरीता कर्ज घेण्यात आले. त्या ट्रॅक्टरचाच अपघात झाला. अशा स्थितीत हातात पीक नाही. कर्जमाफीत नाव नाही. हातात पीक नाही. हे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.कर्जमाफीला मुकलेल्या शेतकऱ्यांचा आकडा गुलदस्त्यातसत्ताधारी निवडणूक प्रचारात कर्जमाफीचा गवगवा करीत आहे. तर दुसरीकडे कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांकडून वसुलीसाठी बँकेने नोटीसा बजावणे सुरू केले आहे. असे किती शेतकरी आहेत, याचा आकडा बँक देण्यास तयार नाही.बॅँक म्हणते, नियमात बसत नसल्याने नोटीसया संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधला असता बँक प्रशासनाकडून नियमात कर्ज बसत नसल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. किती शेतकऱ्यांना या नोटीस बजावल्या गेल्या याची माहिती बँकेकडे उपलब्ध नाही. तालुका स्तरावरून ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.कर्जाच्या थकबाकीने बँकेचा एनपीए मोठा आहे. अशा ज्या शेतकऱ्यांचे कर्ज नियमात बसले नाही. अशाच शेतकऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. बँकेची ही रूटीन कारवाई आहे.- प्रशांत दरोईविशेष कार्यासन अधिकारीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी