शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वासहा लाख प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा; रविवारी तीन तासांचा पेपर 

By अविनाश साबापुरे | Updated: March 14, 2024 17:23 IST

केंद्र सरकारकडून मिळणार साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र, अडथळा आणल्यास एफआयआर.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : राज्यात एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता राज्यातील सव्वासहा लाख प्रौढ निरक्षरांचीही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी ही तीन तासांची लेखी परीक्षा होणार आहे. याबाबत योजना शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

 राज्यासह संपूर्ण देशात १५ वर्षांवरील निरक्षरांसाठी नव भारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत किती प्रौढ निरक्षर आता साक्षर झाले याची चाचणी रविवारी घेतली जाणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्रात आतापर्यंत सहा लाख २१ हजार ४६२ प्रौढ निरक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी झाली आहे. या सव्वासहा लाख लोकांची परीक्षा घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पाच लाखांहून अधिक लोक ही परीक्षा देतील असा अंदाज शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

 या परीक्षेसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून अवर सचिव प्रदीप हेडाऊ १६ ते १८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. परीक्षा कामात अडथळे आणाणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना योजना संचालनालयाने दिल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती परीक्षार्थी?

अहमदनगर : १३,४७१, अकोला : २४,६९९, अमरावती : ३०,५४३, छत्रपती संभाजीनगर : १६,२१७, भंडारा : ९,०९३, बिड : ११,९१२, बुलडाणा : १४,१३४, चंद्रपूर : ३६,७४६, धुळे : १०,१०४, गडचिरोली : ६०,७७७, गोंदिया : ९,२९४, हिंगोली : ११,४९०, जळगाव : ६७,५७५, जालना : १५,२८६, कोल्हापूर : २,८०५, लातूर : ४,६०९, मुंबई १९,९३१, नागपूर : १२,२६८, नांदेड : २१, ३९०, नंदूरबार : ३१,२४२, नाशिक : ३३,२७९, धाराशिव : ५,५४५, पालघर : १६,३०२, परभणी : २०,०२५, पुणे : १०,७१८, रायगड : ९,३७३, रत्नागिरी : १५,१७९, सांगली : ७,८९५, सातारा : ५,०५९, सिंधुदुर्ग : २६१, सोलापूर : १९,२२४, ठाणे : २०,८२१, वर्धा : १,८१७, वाशिम : १८,१४४, यवतमाळ : १४,२३४, एकूण महाराष्ट्र : ६,२१,४६२

अशी असेल प्रश्नपत्रिका :

प्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर येत्या रविवारी न चुकता सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या सवडीने स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहावे. - डॉ. महेश पालकर, योजना शिक्षण संचालक

ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी झालेली आहे, ती शाळाच परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे. - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणexamपरीक्षा