शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या चकरा, शेतकरीही हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:49 IST

सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे. एवढे मोठे क्षेत्र असल्याने जवळपास प्रत्येक शेतकºयाच्या शेतात हे पीक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीनवरील करपा व अळीचा प्रादुर्भाव शेतकºयांमधून मोठी ओरड होण्यास कारणीभूत ठरला आहे. विरोधकच नव्हे, सत्ताधारीही यासाठी निवेदने देत आहेत. शेतकरी भेटेल त्याला पीकविमा व नुकसान भरपाईबाबत प्रयत्न करण्याची याचना करीत आहे.यामध्ये बहुतांश शेतकºयांना मोठा फटका बसला असला तरीही कृषी विभागाने केवळ पीकविमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पीकविमा कंपन्या दरवर्षीच विमा भरून घेतल्यानंतर मात्र फिरकत नाहीत. कितीही बोंब झाली तरीही त्यांची प्रक्रिया पूर्ण करूनही दाद दिल्याचे चित्र कधीच दिसले नाही. त्यामुळे शेतकºयांना यंदाही तो भरवसा वाटत नसल्याने निवेदनांचा पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे हा ओघ वाढल्याचे चित्र आहे.शेतकºयांच्या रेट्यापुढे पुढारीही आता जिल्हा कचेरी, तहसीलच्या चकरा मारून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशा मागणीची निवेदने देताना दिसत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी