लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीत कितीही आधुनिक साधनांचा वापर केला असला तरी परंपरागत बैलजोडीला अजूनही १०० टक्के पर्याय नाही. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिरेकी पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक झाली. १५ दिवसानंतर काही उघाड मिळाली. मात्र या काळात पिकांच्या आंतर मशागतीसाठी लागणारी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले. लंपी हा संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये बळावला आहे. या संकटातून जनावरे वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले. मात्र ओल्या मातीत मशागतीचे काम बैलाशिवाय करता येणे शक्य नाही. इतर कुठलेही यंत्र अशा स्थितीत मशागतीसाठी उपयोगी ठरत नाही. शिवाय आता कपाशी, सोयाबीनची चांगली वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले. शिवाय बुरशीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे. या स्थितीत गोठ्यातील बैल लंपी आजाराने ग्रासला आहे. ग्रामीण भागात आता बैलांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. पशुधन सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत आंतरमशागतीसाठी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले आहे. लंपी हा आजार औषधोपचाराने पूर्णत: बरा होणारा असला तरी आजारी जनावरात प्रचंड अशक्तपणा येतो त्यामुळे तो बरेच दिवस कामात येत नाही. संसर्ग थांबविण्यासाठी अशा जनावरांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.लंपी त्वचारोग संसर्गाने वाढतो. गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उपचाराने चार दिवसात हा आजार बरा होतो. आता प्रतिबंधासाठी गोटफॉक्स ही लस मागविली आहे. सध्या आवश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अशा जनावरांना स्वतंत्र ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. राजीव खेरडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
लंपी आजारामुळे डवरणीचे काम खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST
लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले.
लंपी आजारामुळे डवरणीचे काम खोळंबले
ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचण : बैलजोडी भाड्याने मिळणेही झाले दुरापास्त, ट्रॅक्टर चालेना