शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लंपी आजारामुळे डवरणीचे काम खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचण : बैलजोडी भाड्याने मिळणेही झाले दुरापास्त, ट्रॅक्टर चालेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीत कितीही आधुनिक साधनांचा वापर केला असला तरी परंपरागत बैलजोडीला अजूनही १०० टक्के पर्याय नाही. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिरेकी पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक झाली. १५ दिवसानंतर काही उघाड मिळाली. मात्र या काळात पिकांच्या आंतर मशागतीसाठी लागणारी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले. लंपी हा संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये बळावला आहे. या संकटातून जनावरे वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले. मात्र ओल्या मातीत मशागतीचे काम बैलाशिवाय करता येणे शक्य नाही. इतर कुठलेही यंत्र अशा स्थितीत मशागतीसाठी उपयोगी ठरत नाही. शिवाय आता कपाशी, सोयाबीनची चांगली वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले. शिवाय बुरशीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे. या स्थितीत गोठ्यातील बैल लंपी आजाराने ग्रासला आहे. ग्रामीण भागात आता बैलांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. पशुधन सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत आंतरमशागतीसाठी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले आहे. लंपी हा आजार औषधोपचाराने पूर्णत: बरा होणारा असला तरी आजारी जनावरात प्रचंड अशक्तपणा येतो त्यामुळे तो बरेच दिवस कामात येत नाही. संसर्ग थांबविण्यासाठी अशा जनावरांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.लंपी त्वचारोग संसर्गाने वाढतो. गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उपचाराने चार दिवसात हा आजार बरा होतो. आता प्रतिबंधासाठी गोटफॉक्स ही लस मागविली आहे. सध्या आवश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अशा जनावरांना स्वतंत्र ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. राजीव खेरडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती