शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लंपी आजारामुळे डवरणीचे काम खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचण : बैलजोडी भाड्याने मिळणेही झाले दुरापास्त, ट्रॅक्टर चालेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीत कितीही आधुनिक साधनांचा वापर केला असला तरी परंपरागत बैलजोडीला अजूनही १०० टक्के पर्याय नाही. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिरेकी पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक झाली. १५ दिवसानंतर काही उघाड मिळाली. मात्र या काळात पिकांच्या आंतर मशागतीसाठी लागणारी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले. लंपी हा संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये बळावला आहे. या संकटातून जनावरे वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. या आजारामुळे जनावरांना प्रचंड अशक्तपणा येतो. सतत लागून असलेला पाऊस अचानक उघडल्याने शेतातील मशागतीचे काम एकाचवेळी सुरू झाले. मात्र ओल्या मातीत मशागतीचे काम बैलाशिवाय करता येणे शक्य नाही. इतर कुठलेही यंत्र अशा स्थितीत मशागतीसाठी उपयोगी ठरत नाही. शिवाय आता कपाशी, सोयाबीनची चांगली वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले. शिवाय बुरशीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पिकांची आंतरमशागत करणे आवश्यक आहे. या स्थितीत गोठ्यातील बैल लंपी आजाराने ग्रासला आहे. ग्रामीण भागात आता बैलांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. पशुधन सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत आंतरमशागतीसाठी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले आहे. लंपी हा आजार औषधोपचाराने पूर्णत: बरा होणारा असला तरी आजारी जनावरात प्रचंड अशक्तपणा येतो त्यामुळे तो बरेच दिवस कामात येत नाही. संसर्ग थांबविण्यासाठी अशा जनावरांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.लंपी त्वचारोग संसर्गाने वाढतो. गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. उपचाराने चार दिवसात हा आजार बरा होतो. आता प्रतिबंधासाठी गोटफॉक्स ही लस मागविली आहे. सध्या आवश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अशा जनावरांना स्वतंत्र ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. राजीव खेरडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती