शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींच्या नेतृत्वाला जिल्ह्यातून लाखमोलाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:43 IST

अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते.

ठळक मुद्देभारतरत्नाच्या आठवणी : आझाद मैदानात गाजली अटलबिहारी वाजपेयी यांची सभा, ७० च्या दशकात कवितेचे गारुड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते. राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व म्हणून पुढे येणाऱ्या अटलजींना ७० च्या दशकात यवतमाळ जिल्ह्यानेही ‘लाखमोलाची’ मदत केली होती. त्यावेळी आझाद मैदानात गुंजलेले या नेत्याचे शब्द आजही ताजे आणि आश्वासक वाटतात.काँग्रेसचा पारंपारिक गड मानला जाणारा यवतमाळ जिल्हा नव्याचेही तेवढ्याच खुल्या दिलाने स्वागत करणारा आहे. त्यामुळेच जनसंघातून राजकीय पटलावर चमकणारे अटलबिहारी वाजपेयी या नावाचीही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. देशाला ताजे-ताजे स्वातंत्र्य मिळाले होते. १९६०-६५ च्या त्या काळात सामाजिक चळवळींनाही जोर चढलेला होता. नेमक्या याच स्थित्यंतराच्या काळात अटलजी यवतमाळात आले.१९६९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचे अध्यक्ष असताना त्यांनी पहिल्यांदा यवतमाळला भेट दिली. देशभरात काँग्रेस हाच एकमेव मोठा राजकीय पक्ष असताना जनसंघाला पूर्ण ताकदीनिशी उभे करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज होती. या पक्षनिधीसाठीच अटलजी खासदार यज्ञदत्त शर्मा यांच्यासोबत जिल्ह्यात आले. त्यावेळी पुसद-उमरखेड परिसरातून तब्बल ५१ हजार रुपयांची देणगी अटलजींच्या हाती सुपूर्द करण्यात आली होती. तर दुसऱ्या वर्षी १९७० मध्ये बलराज मधोक यांच्यासह अटलजींनी पुन्हा जिल्ह्यात दौरा केला. जिल्ह्याविषयीचा त्यांचा विश्वास सार्थ ठरवित पुन्हा ६५ हजार रुपयांचा पक्षनिधी देण्यात आला.जनसंघाने १९८० मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून नवे रुप धारण केल्यावर आर्थिक पाठबळाची गरजही वाढली होती. या पक्षाचा यवतमाळातील पहिला जाहीर कार्यक्रम १९८३ मध्ये आझाद मैदानावर झाला. तत्कालीन पक्षाध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी हजर होते. त्यांच्या या तिसऱ्या दौऱ्यातही जिल्हावासीयांनी तब्बल दीड लाख रुपयांचा निधी दिला. त्यावेळी आझाद मैदानात झालेल्या सभेतील अटलजींचे भाषण जुन्या जाणकारांना आजही आठवते. या सभेला त्यावेळचे भाजपाचे राज्याध्यक्ष मोतीरामजी लहाने, जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाई पटेल, तत्कालीन आमदार गंगाधरराव फडणवीस, सरचिटणीस डॉ. अशोक गिरी, वसंतराव चिद्दरवार (दिग्रस), बाळासाहेब अत्रे (पुसद), डॉ. मधुसुदन मारू, डॉ. दिनकरराव बोधनकर, जयंत भिसे, उद्धवराव येरमे, अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे आदी या सभेला उपस्थित होते.अटलजींच्या प्रारंभीच्या काळात यवतमाळ जिल्ह्याने दिलेली लाखमोलाची मदत महत्वाची ठरली. गुरुवारी दिल्ली येथे अटलजींची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त जिल्ह्यात धडकताच भाजपाच्या वर्तुळासह सर्वच कार्यकर्त्यांमध्ये शोकभावना पसरली.एका कवितेने जिंकला जिल्हापक्षासाठी निधी गोळा करताना अटलजींच्या नेतृत्व गुणांसोबतच त्यांच्या तडाखेबाज कविताही महत्वपूर्ण ठरल्या. यवतमाळ जिल्ह्यातून पक्षनिधी गोळा करून तो अटलजींना सुपूर्द करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हा कार्यकारिणीने घेतला होता. त्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता असलेले ‘ट्राय कलर फोल्डर’ तयार करण्यात आले. हे फोल्डरही महाराष्ट्रात पहिल्यांदाच बनविले गेले होते. अटलजींची कविता आवडल्याने लोकांनी हे फोल्डर भराभर घेतले. प्रती फोल्डर एक रुपया याप्रमाणे लोकांकडून निधी घेण्यात आला. आश्चर्य म्हणजे केवळ एका कवितेमुळे तब्बल दीड लाख रुपयांचा निधी त्यावेळी गोळा झाला होता.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी