शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मनातील संवेदना जिवंत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:19 IST

मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देबबन सराडकर : कवी शंकर बडे मायबोली सन्मान प्रदान, गोतावळाच्यावतीने झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हल्ली घरं मोठी झाली पण माणसांच्या मनाचे कोपरे संकुचित झाले आहे. मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.कवी शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन बबन सराडकर यांचा येथे आयोजित कार्यक्रमात सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव कसारे होते. प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख, कीर्ती सांगळे-बडे उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना बबन सराडकर म्हणाले, माणूस संवेदनशीलता हरवत चालला की काय, अशी आजुबाजूची परिस्थिती आहे. घरातील वडिलधारे अडगळीत आणि पाळीव प्राणी दिवानखान्यात अशी विसंगती बघायला मिळते. आपल्या घरातील लोकांवर मृत्यूनंतरचे सोपस्कार करून प्रेम दाखविण्याऐवजी जिवंतपणी त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मायेचा आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.शंकर बडे यांच्या स्मृतीनिमित्त घेतलेल्या वऱ्हाडी काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केतकी कोंडेकर तर द्वितीय क्रमांक अश्विनी शेंबे या विद्यार्थिनीने मिळविला. यावेळी शंकर बडे यांच्या निवडक कवितांचे संगीतमय सादरीकरण व रसग्रहण ‘जावे कवितेच्या गावा’ या कार्यक्रमामधून झाले. प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख व कीर्ती बडे-सांगळे यांनी काकांच्या कवितांचे विवेचन तर कवी जयंत चावरे यांनी निवेदन व अंजली सरुळकर, दत्तात्रय देशपांडे, राजू कोळवणकर, प्रकाश कुमरे, आकाश सैतवाल यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी तर संचालन स्नेहा लांडगे यांनी केले.बडेंनी समाजाच्या वेदना वेचल्याकवी शंकर बडेंचे बोट धरून आपण काव्य मैफलींमध्ये मुशाफिरी केली. बडेंनी कवितेतून समाजाच्या वेदना वेचल्या. उपेक्षित माणूस ते वाचायचे आणि त्यातून त्यांना कविता गवसली. त्यांच्या काव्यगंधाने आपली आयुष्यं सुगंधित केली. बडेंच्या कवितेचा सुगंध कायम दरवळत राहणार आहे, असे कवी बबन सराडकर म्हणाले. बडेंच्या नावाने मिळालेल्या मायबोली सन्मानाने आपण कृतार्थ झालो. गोतावळ्याने दिलेली ही कौतुकाची थाप अंत:करणावर मोरपीस फिरवणारी आहे. नातेसंबंध विसरण्याच्या काळात कवी बडे यांचा रक्तापलिकडचा गोतावळा त्यांच्या स्मृतींचा जागर करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार बबन सराडकर यांनी यावेळी काढले.

टॅग्स :Socialसामाजिक