शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मनातील संवेदना जिवंत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:19 IST

मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देबबन सराडकर : कवी शंकर बडे मायबोली सन्मान प्रदान, गोतावळाच्यावतीने झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हल्ली घरं मोठी झाली पण माणसांच्या मनाचे कोपरे संकुचित झाले आहे. मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.कवी शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन बबन सराडकर यांचा येथे आयोजित कार्यक्रमात सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव कसारे होते. प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख, कीर्ती सांगळे-बडे उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना बबन सराडकर म्हणाले, माणूस संवेदनशीलता हरवत चालला की काय, अशी आजुबाजूची परिस्थिती आहे. घरातील वडिलधारे अडगळीत आणि पाळीव प्राणी दिवानखान्यात अशी विसंगती बघायला मिळते. आपल्या घरातील लोकांवर मृत्यूनंतरचे सोपस्कार करून प्रेम दाखविण्याऐवजी जिवंतपणी त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मायेचा आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.शंकर बडे यांच्या स्मृतीनिमित्त घेतलेल्या वऱ्हाडी काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केतकी कोंडेकर तर द्वितीय क्रमांक अश्विनी शेंबे या विद्यार्थिनीने मिळविला. यावेळी शंकर बडे यांच्या निवडक कवितांचे संगीतमय सादरीकरण व रसग्रहण ‘जावे कवितेच्या गावा’ या कार्यक्रमामधून झाले. प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख व कीर्ती बडे-सांगळे यांनी काकांच्या कवितांचे विवेचन तर कवी जयंत चावरे यांनी निवेदन व अंजली सरुळकर, दत्तात्रय देशपांडे, राजू कोळवणकर, प्रकाश कुमरे, आकाश सैतवाल यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी तर संचालन स्नेहा लांडगे यांनी केले.बडेंनी समाजाच्या वेदना वेचल्याकवी शंकर बडेंचे बोट धरून आपण काव्य मैफलींमध्ये मुशाफिरी केली. बडेंनी कवितेतून समाजाच्या वेदना वेचल्या. उपेक्षित माणूस ते वाचायचे आणि त्यातून त्यांना कविता गवसली. त्यांच्या काव्यगंधाने आपली आयुष्यं सुगंधित केली. बडेंच्या कवितेचा सुगंध कायम दरवळत राहणार आहे, असे कवी बबन सराडकर म्हणाले. बडेंच्या नावाने मिळालेल्या मायबोली सन्मानाने आपण कृतार्थ झालो. गोतावळ्याने दिलेली ही कौतुकाची थाप अंत:करणावर मोरपीस फिरवणारी आहे. नातेसंबंध विसरण्याच्या काळात कवी बडे यांचा रक्तापलिकडचा गोतावळा त्यांच्या स्मृतींचा जागर करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार बबन सराडकर यांनी यावेळी काढले.

टॅग्स :Socialसामाजिक