शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनातील संवेदना जिवंत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:19 IST

मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देबबन सराडकर : कवी शंकर बडे मायबोली सन्मान प्रदान, गोतावळाच्यावतीने झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हल्ली घरं मोठी झाली पण माणसांच्या मनाचे कोपरे संकुचित झाले आहे. मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.कवी शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन बबन सराडकर यांचा येथे आयोजित कार्यक्रमात सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव कसारे होते. प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख, कीर्ती सांगळे-बडे उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना बबन सराडकर म्हणाले, माणूस संवेदनशीलता हरवत चालला की काय, अशी आजुबाजूची परिस्थिती आहे. घरातील वडिलधारे अडगळीत आणि पाळीव प्राणी दिवानखान्यात अशी विसंगती बघायला मिळते. आपल्या घरातील लोकांवर मृत्यूनंतरचे सोपस्कार करून प्रेम दाखविण्याऐवजी जिवंतपणी त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मायेचा आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.शंकर बडे यांच्या स्मृतीनिमित्त घेतलेल्या वऱ्हाडी काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केतकी कोंडेकर तर द्वितीय क्रमांक अश्विनी शेंबे या विद्यार्थिनीने मिळविला. यावेळी शंकर बडे यांच्या निवडक कवितांचे संगीतमय सादरीकरण व रसग्रहण ‘जावे कवितेच्या गावा’ या कार्यक्रमामधून झाले. प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख व कीर्ती बडे-सांगळे यांनी काकांच्या कवितांचे विवेचन तर कवी जयंत चावरे यांनी निवेदन व अंजली सरुळकर, दत्तात्रय देशपांडे, राजू कोळवणकर, प्रकाश कुमरे, आकाश सैतवाल यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी तर संचालन स्नेहा लांडगे यांनी केले.बडेंनी समाजाच्या वेदना वेचल्याकवी शंकर बडेंचे बोट धरून आपण काव्य मैफलींमध्ये मुशाफिरी केली. बडेंनी कवितेतून समाजाच्या वेदना वेचल्या. उपेक्षित माणूस ते वाचायचे आणि त्यातून त्यांना कविता गवसली. त्यांच्या काव्यगंधाने आपली आयुष्यं सुगंधित केली. बडेंच्या कवितेचा सुगंध कायम दरवळत राहणार आहे, असे कवी बबन सराडकर म्हणाले. बडेंच्या नावाने मिळालेल्या मायबोली सन्मानाने आपण कृतार्थ झालो. गोतावळ्याने दिलेली ही कौतुकाची थाप अंत:करणावर मोरपीस फिरवणारी आहे. नातेसंबंध विसरण्याच्या काळात कवी बडे यांचा रक्तापलिकडचा गोतावळा त्यांच्या स्मृतींचा जागर करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार बबन सराडकर यांनी यावेळी काढले.

टॅग्स :Socialसामाजिक