शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळ अनुदान योजनेची विदर्भात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 21:24 IST

Yawatmal News कांदा चाळ अनुदान योजनेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विदर्भातील ४७६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या एका शेतकऱ्याला या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देलॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ४७६ पैकी एकाच शेतकऱ्याला अनुदान

 

विशाल सोनटक्के

यवतमाळ : कधी बळीराजा चेतना, तर कधी कृषी संजीवनी अशी वेगवेगळी नावे देत, तर कधी मागेल त्याला देणार, असा जयघोष करीत शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना आणते. मात्र, या योजनांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो हा प्रश्न नेहमीच वादाचा राहिला आहे. आता कांदा चाळ अनुदानावरूनही या योजनेसमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विदर्भातील ४७६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या एका शेतकऱ्याला या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांचे देशभर सुरू असलेले आंदोलन आणि त्यामुळे शासन-प्रशासनावर दबाव येत असला तरी हे घटक आपल्या कार्यपद्धतीत बदल करायला तयार नसल्याचेच या योजनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. शेतकरी सर्वसाधारणपणे जमिनीवर कांदा पसरवून ठेवतो. त्यामुळे कांद्याचे नुकसान होते. कांद्याच्या टिकाऊपणावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी कांद्याची योग्य गुणवत्ता राखण्यासाठी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कांदा चाळ अनुदान योजना आणलेली आहे. या योजनेंतर्गत २५ टनापर्यंतच्या चाळीसाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा ८७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार होते. यासाठी आलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी चालू वर्षात तब्बल तीन हजार ५३२ शेतकरी लॉटरी पद्धतीने निवडले गेले. मात्र, त्यातील १२३१ जणांचे अर्ज छाननीमध्ये रद्द झाले, तर १४२५ शेतकरी निवड होऊनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केली. त्यातीलही अनेकांचे अर्ज कृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी स्तरावरच लटकल्याने लॉटरी पद्धतीने एप्रिल महिन्यात निवड केलेल्या तीन हजार ५३२ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ६७ शेतकऱ्यांनाच या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे, तर २७ शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

विदर्भाच्या तोंडाला पुसली पाने

विदर्भात कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी कमी आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळत असला तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबरोबरच कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेमुळे या शेतकऱ्यांना योजनेच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातून ११३, अमरावती १२०, बुलडाणा ७७, चंद्रपूर ४९, नागपूर ३१, वर्धा १६, वाशिम २०, यवतमाळ ३५, तर भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी पाच असे एकूण ४७६ शेतकरी लॉटरी पद्धतीने निवडले होते. मात्र, पाच महिन्यांनंतरही यातील केवळ एकाच शेतकऱ्याला प्रत्यक्ष अनुदान प्राप्त झाले आहे.

टॅग्स :onionकांदा