शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

कांदा चाळ अनुदान योजनेची विदर्भात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 21:24 IST

Yawatmal News कांदा चाळ अनुदान योजनेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विदर्भातील ४७६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या एका शेतकऱ्याला या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देलॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ४७६ पैकी एकाच शेतकऱ्याला अनुदान

 

विशाल सोनटक्के

यवतमाळ : कधी बळीराजा चेतना, तर कधी कृषी संजीवनी अशी वेगवेगळी नावे देत, तर कधी मागेल त्याला देणार, असा जयघोष करीत शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना आणते. मात्र, या योजनांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो हा प्रश्न नेहमीच वादाचा राहिला आहे. आता कांदा चाळ अनुदानावरूनही या योजनेसमोरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विदर्भातील ४७६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या एका शेतकऱ्याला या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांचे देशभर सुरू असलेले आंदोलन आणि त्यामुळे शासन-प्रशासनावर दबाव येत असला तरी हे घटक आपल्या कार्यपद्धतीत बदल करायला तयार नसल्याचेच या योजनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. शेतकरी सर्वसाधारणपणे जमिनीवर कांदा पसरवून ठेवतो. त्यामुळे कांद्याचे नुकसान होते. कांद्याच्या टिकाऊपणावरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी कांद्याची योग्य गुणवत्ता राखण्यासाठी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कांदा चाळ अनुदान योजना आणलेली आहे. या योजनेंतर्गत २५ टनापर्यंतच्या चाळीसाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा ८७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार होते. यासाठी आलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी चालू वर्षात तब्बल तीन हजार ५३२ शेतकरी लॉटरी पद्धतीने निवडले गेले. मात्र, त्यातील १२३१ जणांचे अर्ज छाननीमध्ये रद्द झाले, तर १४२५ शेतकरी निवड होऊनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केली. त्यातीलही अनेकांचे अर्ज कृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी स्तरावरच लटकल्याने लॉटरी पद्धतीने एप्रिल महिन्यात निवड केलेल्या तीन हजार ५३२ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ६७ शेतकऱ्यांनाच या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे, तर २७ शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

विदर्भाच्या तोंडाला पुसली पाने

विदर्भात कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी कमी आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळत असला तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबरोबरच कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेमुळे या शेतकऱ्यांना योजनेच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातून ११३, अमरावती १२०, बुलडाणा ७७, चंद्रपूर ४९, नागपूर ३१, वर्धा १६, वाशिम २०, यवतमाळ ३५, तर भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी पाच असे एकूण ४७६ शेतकरी लॉटरी पद्धतीने निवडले होते. मात्र, पाच महिन्यांनंतरही यातील केवळ एकाच शेतकऱ्याला प्रत्यक्ष अनुदान प्राप्त झाले आहे.

टॅग्स :onionकांदा