शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:51 IST

Yavatmal : चौकशी अहवालानंतरही कारवाई थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : आनंदनगर येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाली आहे. या प्रकरणात गावकऱ्यांच्या तक्रारीवर चौकशी समिती नेमून अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 

जलजीवनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सीमा वानखेडे, देवीदास राठोड, विनायक भारती, विशाल रोकडे, अर्जुन - कदम, सचिन आगरकर, करण - आगरकर, सतीश गावंडे, अजय कदम आदींनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे राळेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता संजय गेडाम - यांच्या नेतृत्वात समिती गठित केली. यानुसार प्रत्यक्ष कामावर चौकशी करण्यात आली. वैयक्तिक नळ जोडणी आणि पाइपलाइनच्या कामावर अंदाजपत्रकानुसार नऊ लाख २६ हजार दोनशे रुपये खर्च अपेक्षित होता.

१५ सप्टेंबर २०२२ रोजी काम पूर्ण झाल्याचा अहवाल देण्यात आला. यावर एकूण सात लाख सात हजार तीनशे पाच रुपये खर्च एमबी दर्शवण्यात आला. या प्रकरणी सरपंच, सचिवांना बडतर्फ करण्याची मागणी आहे. समितीचे संजय गेडाम, पंजाब रणमले, उमेश गोरडे आदींच्या सह्यानिशी अहवाल सादर करण्यात आला. परंतु, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

"चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. कार्यवाहीचे अधिकार वरिष्ठांना आहे."- डी.एच. टाकरस गटविकास अधिकारी, महागाव. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाYavatmalयवतमाळ