मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:42+5:30
राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे.

मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत आहे. परराज्यातून अथवा पुणे, मुंबई येथून कोणी गावात आले, तर त्याला गावात घ्यायला गावकरी विरोध करतात. आरोग्य विभागाकडे याला विलगिकरण कक्षात टाकण्याची मागणी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलेल्या गोंडबुरांडा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर आरोग्य विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींना फक्त होमक्वांरटाईन करीत असल्याने विलगिकरण कक्ष ओस पडले आहेत.
राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. तालुका प्रासशानाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तालुक्यात मुंबई येथून ३२, पुणे येथून ८४, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ३११ नागरिक तालुक्यात आले. यासोबतच आंध्रप्रदेशातून सहा, पश्चिम बंगालमधून दोन, राजस्थानातून आठ, मध्यप्रदेशातून १०, तेलंगाणातून २४, गुजरातमधून सात, कर्नाटक तीन, उत्तरप्रदेश दोन, बिहार दोन, छत्तीसगढमधून दोन, असे एकूण ४९३ नागरिक संचारबंदीकाळात तालुक्यात आल्याची नोंद आहे.
अजुनही नागरिकांचे येणे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक येत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे बाहेरून गावात कोणी दाखल झाले की नागरिक प्रशासनाला तात्काळ याबाबत माहिती देत आहेत. या सर्वांना विलगिकरण कक्षातच ठेवण्याची मागणी आहे.