शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षानंतरही सिंचनाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन होते.

ठळक मुद्देअडाण प्रकल्प : कालवे दुरुस्तीसाठी १०० कोटींच्या निधीची गरज

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन होते. प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेइतके पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. यासाठी जलभूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (वाल्मी) यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून ११८ कोटी रुपयांचा आराखडा दिला आहे.६५ किलोमीटरच्या आणि ५० किलोमीटर अशा दोन कालव्यातून शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी नवीन आराखड्यानुसार ११८ कोटी खर्च अपेक्षित आहे. शासन हा निधी उपलब्ध करून देणार का यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.कालव्यातून ५० किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले असले तरी कालवे नादुरुस्त झाल्यामुळे व्यवस्थित सिंचन होऊ शकत नाही. आणि पुढील भागात मात्र पाण्याचा थेंबही गेला नाही. त्यामुळे या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पाच्या कालव्याच्या लांबीत असणारे जलसेतू ,ग्रामीण मार्ग पूल, हसूम ,मालिका मोरी, क्रॉस रेगुलेटर, सायफन, अशी विविध प्रकारची एकूण १८७ बांधकामे असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कालव्याचे अस्तरीकरण करणे सुद्धा आवश्यक आहे. टेलपर्यंत पाणी पोहोचण्याकरीता यामागची तांत्रिक कारणे शोधणे गरजेचे आहे. हीच बाब हेरून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याकरिता वाल्मी मार्फत या प्रकल्पाचा अभ्यास व्हावा यासाठी पुढाकार घेतला. डिसेंबर २०१५ मध्ये वाल्मीने प्रकल्पाची पाहणी केली. सूक्ष्म अभ्यासाअंती काही दिवसांपूर्वी त्यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती करीता शंभर कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कालव्याच्या दुरुस्ती करीता पुरेसा निधी मिळावा याकरिता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी प्रयत्न सुरू केले आहे. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक सुद्धा पार पडली. बैठकीत संजय राठोड यांनी वाल्मी च्या शिफारसीनुसार कालवे दुरुस्तीचे कामाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.लाभ क्षेत्रातील गावे कोरडीचया प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या म्हसणी, रामगाव, बोदेगाव, मानकोपरा, चिखली, भांडेगाव, मानकी, कोलवाई, तेलगव्हाण, घाटकिन्ही, तळेगाव, पाळोदी, घाणापुर, शेंद्री, डोल्हारी, पेकर्डा, गणेशपुर, गौळपेंड, शेलोडी, बोरी, वघुळ, कीन्हीवळकी, बागवाडी सायखेडा, साजेगाव पिंप्री, दहेली, हरु व निंभा येथे अजूनही सिंचनाचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :WaterपाणीDamधरण