शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे कृषी अधीक्षकांना आदेश, चौकशीवर स्वत: वॉच ठेवणार, पाळेमुळे खणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहर व जिल्ह्यात प्रमुख वितरकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शनिवारी जारी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली असून आपण स्वत: या चौकशीवर वॉच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. थेट कंपन्यांकडून कोण्या वितरकाने किती बियाण्यांचे बुकिंग-सौदे केले, दर काय होता याचा लेखाजोखा मागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे. वास्तविक सौदे घेतानाच कंपन्यांशी ‘एमआरपी’ किती राहील याचा ‘सौदा’ही वितरक करतात व त्यांच्या सोईनेच कंपन्या एमआरपी नोंदवितात. याच एमआरपीच्या आड शेतकºयांची आर्थिक पिळवणूक वितरकांकडून केली जाते. या वितरकांचे पांढरकवडा रोड, धामणगाव रोड व अन्य भागातील गोदामे सोयाबीन बियाण्यांनी भरुन आहेत. त्यानंतरही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कंपनीकडून अलॉटमेंट आले नाही, लॉकडाऊनमुळे कंपन्या पेमेंटसाठी साईड देत नाहीत, अशी कारणे सांगून रिटेलरला मागणीच्या अर्धाच माल दिला जात आहे. शेतकºयांनाही अव्वाच्या सव्वा दर सांगून नागविले जात आहे.शेतकऱ्यांनो, घरचेच बियाणे पेरा - एडीओआधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ७०० रुपये प्रति बॅग जादा दराने बियाणे घ्यावे लागत आहे. कृत्रिम टंचाई हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे शेतकºयांनी यावेळी घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी केले आहे. ‘लोकमत’शी बोलताना बरडे म्हणाले, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागाने मोहीम राबविली आहे. या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल तर एकरी ३० किलो, ६५ टक्के असेल तर ३३ किलो आणि उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ३६ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने जिल्हाभरातील शेतकºयांना दिला आहे.बँक स्टेटमेंट तपासा ना !सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून ‘वास्तव’ दडपले जाण्याची व चौकशी अधिकाºयाची दिशाभूल केली जाण्याची दाट शक्यता आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून वितरकांनी बियाणे कंपन्यांशी सौदे-बुकिंग सुरू केले. त्यामुळे या वितरकांचे सर्व बँकांतील खात्यांचे स्टेटमेंट तपासल्यास कोणत्या कंपनीला किती रकमेचा आरटीजीएस झाला, बियाण्याचा भाव काय, बाहेर जिल्ह्यातून किती आरटीजीएस आले आदी मुद्दे स्पष्ट होणार आहे. ५२ ते ५५ रुपये किलोच्या सोयाबीनचा दर ७० ते ९० रुपयापर्यंत कसा गेला हेसुद्धा यातून सिद्ध होण्यास चौकशी अधिकाऱ्याला मदत होईल.खरेदी तीन हजाराने, विक्री नऊ हजाराने !शेतकºयांकडून साडेतीन हजार रुपये दराने सोयाबीन घेऊन प्रमुख वितरक तोच माल आता बियाणे म्हणून खरीपात सात हजार ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विकला जात आहे. या सर्व प्रमुख वितरकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘घरचेच बियाणे वापरणे’ हाच भक्कम पर्याय असल्याचे मानले जाते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती