शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे कृषी अधीक्षकांना आदेश, चौकशीवर स्वत: वॉच ठेवणार, पाळेमुळे खणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहर व जिल्ह्यात प्रमुख वितरकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शनिवारी जारी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली असून आपण स्वत: या चौकशीवर वॉच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. थेट कंपन्यांकडून कोण्या वितरकाने किती बियाण्यांचे बुकिंग-सौदे केले, दर काय होता याचा लेखाजोखा मागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे. वास्तविक सौदे घेतानाच कंपन्यांशी ‘एमआरपी’ किती राहील याचा ‘सौदा’ही वितरक करतात व त्यांच्या सोईनेच कंपन्या एमआरपी नोंदवितात. याच एमआरपीच्या आड शेतकºयांची आर्थिक पिळवणूक वितरकांकडून केली जाते. या वितरकांचे पांढरकवडा रोड, धामणगाव रोड व अन्य भागातील गोदामे सोयाबीन बियाण्यांनी भरुन आहेत. त्यानंतरही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कंपनीकडून अलॉटमेंट आले नाही, लॉकडाऊनमुळे कंपन्या पेमेंटसाठी साईड देत नाहीत, अशी कारणे सांगून रिटेलरला मागणीच्या अर्धाच माल दिला जात आहे. शेतकºयांनाही अव्वाच्या सव्वा दर सांगून नागविले जात आहे.शेतकऱ्यांनो, घरचेच बियाणे पेरा - एडीओआधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ७०० रुपये प्रति बॅग जादा दराने बियाणे घ्यावे लागत आहे. कृत्रिम टंचाई हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे शेतकºयांनी यावेळी घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी केले आहे. ‘लोकमत’शी बोलताना बरडे म्हणाले, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागाने मोहीम राबविली आहे. या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल तर एकरी ३० किलो, ६५ टक्के असेल तर ३३ किलो आणि उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ३६ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने जिल्हाभरातील शेतकºयांना दिला आहे.बँक स्टेटमेंट तपासा ना !सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून ‘वास्तव’ दडपले जाण्याची व चौकशी अधिकाºयाची दिशाभूल केली जाण्याची दाट शक्यता आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून वितरकांनी बियाणे कंपन्यांशी सौदे-बुकिंग सुरू केले. त्यामुळे या वितरकांचे सर्व बँकांतील खात्यांचे स्टेटमेंट तपासल्यास कोणत्या कंपनीला किती रकमेचा आरटीजीएस झाला, बियाण्याचा भाव काय, बाहेर जिल्ह्यातून किती आरटीजीएस आले आदी मुद्दे स्पष्ट होणार आहे. ५२ ते ५५ रुपये किलोच्या सोयाबीनचा दर ७० ते ९० रुपयापर्यंत कसा गेला हेसुद्धा यातून सिद्ध होण्यास चौकशी अधिकाऱ्याला मदत होईल.खरेदी तीन हजाराने, विक्री नऊ हजाराने !शेतकºयांकडून साडेतीन हजार रुपये दराने सोयाबीन घेऊन प्रमुख वितरक तोच माल आता बियाणे म्हणून खरीपात सात हजार ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विकला जात आहे. या सर्व प्रमुख वितरकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘घरचेच बियाणे वापरणे’ हाच भक्कम पर्याय असल्याचे मानले जाते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती