शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे कृषी अधीक्षकांना आदेश, चौकशीवर स्वत: वॉच ठेवणार, पाळेमुळे खणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहर व जिल्ह्यात प्रमुख वितरकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शनिवारी जारी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली असून आपण स्वत: या चौकशीवर वॉच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. थेट कंपन्यांकडून कोण्या वितरकाने किती बियाण्यांचे बुकिंग-सौदे केले, दर काय होता याचा लेखाजोखा मागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे. वास्तविक सौदे घेतानाच कंपन्यांशी ‘एमआरपी’ किती राहील याचा ‘सौदा’ही वितरक करतात व त्यांच्या सोईनेच कंपन्या एमआरपी नोंदवितात. याच एमआरपीच्या आड शेतकºयांची आर्थिक पिळवणूक वितरकांकडून केली जाते. या वितरकांचे पांढरकवडा रोड, धामणगाव रोड व अन्य भागातील गोदामे सोयाबीन बियाण्यांनी भरुन आहेत. त्यानंतरही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कंपनीकडून अलॉटमेंट आले नाही, लॉकडाऊनमुळे कंपन्या पेमेंटसाठी साईड देत नाहीत, अशी कारणे सांगून रिटेलरला मागणीच्या अर्धाच माल दिला जात आहे. शेतकºयांनाही अव्वाच्या सव्वा दर सांगून नागविले जात आहे.शेतकऱ्यांनो, घरचेच बियाणे पेरा - एडीओआधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ७०० रुपये प्रति बॅग जादा दराने बियाणे घ्यावे लागत आहे. कृत्रिम टंचाई हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे शेतकºयांनी यावेळी घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी केले आहे. ‘लोकमत’शी बोलताना बरडे म्हणाले, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागाने मोहीम राबविली आहे. या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल तर एकरी ३० किलो, ६५ टक्के असेल तर ३३ किलो आणि उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ३६ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने जिल्हाभरातील शेतकºयांना दिला आहे.बँक स्टेटमेंट तपासा ना !सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून ‘वास्तव’ दडपले जाण्याची व चौकशी अधिकाºयाची दिशाभूल केली जाण्याची दाट शक्यता आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून वितरकांनी बियाणे कंपन्यांशी सौदे-बुकिंग सुरू केले. त्यामुळे या वितरकांचे सर्व बँकांतील खात्यांचे स्टेटमेंट तपासल्यास कोणत्या कंपनीला किती रकमेचा आरटीजीएस झाला, बियाण्याचा भाव काय, बाहेर जिल्ह्यातून किती आरटीजीएस आले आदी मुद्दे स्पष्ट होणार आहे. ५२ ते ५५ रुपये किलोच्या सोयाबीनचा दर ७० ते ९० रुपयापर्यंत कसा गेला हेसुद्धा यातून सिद्ध होण्यास चौकशी अधिकाऱ्याला मदत होईल.खरेदी तीन हजाराने, विक्री नऊ हजाराने !शेतकºयांकडून साडेतीन हजार रुपये दराने सोयाबीन घेऊन प्रमुख वितरक तोच माल आता बियाणे म्हणून खरीपात सात हजार ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विकला जात आहे. या सर्व प्रमुख वितरकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘घरचेच बियाणे वापरणे’ हाच भक्कम पर्याय असल्याचे मानले जाते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती