शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा; ५० हजारांचे बक्षीस देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:36 IST

Yavatmal : तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावरही शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. यात विजेत्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात चालान भरावे लागणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना १५० रुपयांचे चालान भरावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची स्वतःच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे. ती जमीन स्वतः कसणे आवश्यक आहे. एकावेळी एका शेतकऱ्याला विविध पिकांच्या स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. या स्पर्धेसाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर राबविली जाणार आहे. यात प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांना तीन विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. शेतशिवारामध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी विविध क्षेत्रात विविध पद्धतीचा अवलंब केला जातो. यातून अनेकांना लाभ होतो, तर काहींना तोटाही होतो. यातील योग्य पद्धती कोणती आहे, याची माहिती स्पर्धा राबविल्यामुळे सर्वांनाच कळणार आहे. याशिवाय अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना स्पर्धा राबविल्यामुळे प्रोत्साहन मिळून असे शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून बदलण्यास मदत होईल. सोबतच कमी खर्चाच्या आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या बाबीदेखील शेतकऱ्यांना कळतील. 

तालुका ते राज्यस्तरावर होणार स्पर्धाया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. यात संबंधित सातबाऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्रावर तसे पीक असणे आवश्यक आहे.

प्रोत्साहन अन् प्रसिद्धीही कृषी वार्ता फलकावर याची माहिती दिली जात आहे. शेतकरी गट आणि कृषी सहायकाच्या माध्यमातूनही गावपातळीवर ही माहिती देण्यात आली आहे.

एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी कुठले तंत्र वापरले, याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंतची मुदत योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज कुठे करणार? शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात अर्ज भरायचा आहे. सोबत सातबारा, आठ-अ, चालान, आधार कार्ड जोडायचे आहे. आदिवासी असेल तर जातप्रमाणपत्र लागणार आहे.

किती रुपयांचे बक्षीस आहे तालुकास्तरावर ५, ३, २ हजारांची तीन बक्षिसे, जिल्हास्तरावर १०, ७, ५ अशी तीन, तर राज्यस्तरावर ५०, ४०, ३० अशी बक्षिसे असणार आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळFarmerशेतकरी