शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साथीच्या तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देडेंग्यू, मलेरिया नियंत्रणात । शासकीय रुग्णालयात वाढतेय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सततच्या ढगाळी वातावरणामुळे साथीच्या तापाची लागण होत आहे. प्रत्येक घरात तापाचे रुग्ण आढळत आहे. सुदैवाने यावर्षी डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरिया सारख्या घातक आजारांचा आतापर्यंत उद्रेक झाला नाही. मात्र सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण दिवसेन्दिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय औषधशास्त्र विभागात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या ही ७०० च्या घरात पोहोचली आहे. यापैकी ५० रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.साधारणत: जुलै महिन्यानंतर आजाराचे प्रमाण वाढण्यास सुरूवात होते. यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातही पाऊस मोजकाच पडला. त्यामुळे डबके साचून, पुराचे पाणी शिरून जलस्त्रोत दूषित झाले नाही. परिणामी साथीच्या आजाराचा कुठे उद्रेक झाला नाही. ही बाब जिल्हावासीयांसाठी सुखद असली, तरी आता साथीच्या तापाने डोके वर काढले आहे. या तापाचा झपाट्याने फैलाव होत आहे. महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.६८ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधाविविध तालुक्यात फवारणीतून विषबाधा होणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ६८ शेतकºयांना विषबाधा झाली आहे. यापैकी ४४ शेतकºयांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर चार शेतकरी अर्धवट उपचार सोडून रुग्णालयातून पळून गेले. अजूनही २० शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. ढगाळ वातारवणामुळे सोयाबीन व कापूस पिकावर अळ्याचा मोठा प्रार्दुभाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकºयांना फवारणी करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच विषबाधा होण्याच्या घटना घडत आहे. कृषी यंत्रणा जनजागृती करत असली तरी विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.व्हायरल फिव्हर म्हणजे साथीचा ताप. या तापाचे रुग्ण काही आठवड्यापासून वाढले आहे. सर्दी, खोकला व घश्यात संसर्गाचे रुग्ण येत आहे. नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावा व योग्य खबरदारी बाळगावी. - डॉ. बाबा येलके,विभाग प्रमुख, औषधीशास्त्र विभाग

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू