शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मिंधे सरकारमुळेच उद्योग गुजरातला; खासदार सावंत, दानवे यांनी डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:39 IST

शिवसेनेच्या मोर्चाला विराट प्रतिसाद

यवतमाळ : खोक्यांच्या बळावर आमदारांची खरेदी करून बनलेले हे सरकार मिंधे आहे. यांच्यामुळेच राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेले आहेत. पंतप्रधान मोदीही देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचे सांगत या मिंद्या सरकारला आता जनतेनेच धडा शिकवावा, अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शासनावर तोफ डागली.

बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे, शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपयांचा हमीभाव द्यावा तसेच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानातून विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. सकाळी ११ पासूनच आझाद मैदान परिसरात शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी १:३०च्या सुमारास खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी मंत्री संजय देशमुख, संतोष ढवळे, माजी आमदार विश्वास नांदेकर, प्रवीण शिंदे, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, किशोर राठोड, माजी नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघाला.

मोर्चात शेतकरी बैलगाडीवर आरुढ झाले होते, तसेच पारंपरिक वेशभूषा केलेल्या बंजारा समुदायातील महिलांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातात राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक होते. मोर्चेकऱ्यांकडून भाजपासह शिंदे गटातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. हा मोर्चा पाचकंदील चौक, नेताजी चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.

शेतकऱ्यांचे जाहीर केलेले अनुदान गेले कुठे?

खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात भाजप-शिंदे गट सरकारवर हल्ला चढविला. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली. मात्र राज्यातील दहा टक्के शेतकऱ्यांनाही हे अनुदान मिळाले नसल्याचे ते म्हणाले.

राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही. त्यात हे सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा घणाघातही सावंत यांनी आपल्या भाषणातून केला.

अतिवृष्टीचे पैसे नाहीत; पण ट्रेनसाठी सहा हजार कोटी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबई-अहमदाबाद ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये या सरकारने वळते केले आहे. मात्र, अतिवृष्टीचे पैसे द्यायला मात्र चालढकल केली जात आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ३७०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील २२०० कोटी एकट्या विदर्भातील आहे. मात्र, त्यापैकी केवळ ७०० कोटी रुपये वाटप करण्यात आले. उर्वरित पैसा ट्रेनच्या नावाखाली गुजरातला पळविल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

सभेत संजय राठोड यांच्यावर बोचरी टीका

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निघालेल्या आक्रोश मोर्चात संजय राठोड टीकेचे लक्ष्य ठरले. खासदार सावंत यांनी राठोड यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. व्यासपीठावर संजय देशमुख बसले होते. त्यांचा उल्लेख करीत हा संजय सच्चा आहे, सोडून गेेलेला संजय लुच्चा होता, असे ते म्हणाले. यावेळी जमलेल्या हजारो मोर्चेकऱ्यांनी संजय राठोड यांच्या निषेधाचे नारे दिले. इतर नेत्यांच्या रडारवरही संजय राठोड राहिले. गद्दार गेले तरी शिवसेना थांबणार नाही, ती पुन्हा जोमात उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या 'या' मागण्यांचे दिले निवेदन

मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील एक लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, २०१८ पासून बंद कृषी वीज जोडणी योजना तत्काळ सुरू करावी, पीक विमा लाभाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यास समसमान द्यावी यासह इतर मागण्यांचा यामध्ये समावेश होता.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाYavatmalयवतमाळArvind Sawantअरविंद सावंतAmbadas Danweyअंबादास दानवे