भारतात यापूर्वी अनेक हिंदू राजे होऊन गेलेत; पण त्यांची चर्चा होत नाही. शिवाजी महाराजांनी अठरापगड
By Admin | Updated: July 27, 2015 01:33 IST2015-07-27T01:33:17+5:302015-07-27T01:33:17+5:30
तालुक्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांना नवसंजीवनी दिली. मात्र त्याच रात्री काकडदाती

भारतात यापूर्वी अनेक हिंदू राजे होऊन गेलेत; पण त्यांची चर्चा होत नाही. शिवाजी महाराजांनी अठरापगड
पुसद : तालुक्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांना नवसंजीवनी दिली. मात्र त्याच रात्री काकडदाती ग्रामपंचायतचे सदस्य धनंजय कांबळे यांचे गोविंदनगरात असलेले दुमजली घर कोसळले. यामध्ये आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली.
पुसद शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भरपावसातच धनंजय कांबळे यांच्या दुमजली घराची भिंत कोसळायला सुरुवात झाली. यावेळी नागरिक आधीच जागे असल्याने त्यांनी धाव घेतली आणि घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले. काही वेळातच संपूर्ण घर भिंतीसह कोसळले. या घटनेत शेजारच्या नत्थू पाईकराव यांच्याही घराला क्षती पोहोचली. शेजाऱ्यांनी कांबळे व पाईकराव कुटुंबीयांना धीर दिला. या दुर्घटनेत आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तब्बल दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील पिकांना नवसंजीवनी देऊन बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर कांबळे व पाईकराव कुटुंबीयांना बेघर व्हावे लागले आहे. (प्रतिनिधी)