शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विद्याविहार कॉलनीत दोन-दोन आठवडे नळाला पाणीच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:13 IST

रविराजनगरात अनियमितता : पाण्याचे फक्त बिलच भरायचे का?

विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नळाचे शुद्ध आणि नियिमत पाणी मिळेल या आशेपोटी नागरिकांनी घरी नळ घेतले. परंतु त्यांची पार निराशा झाली. काही भागात पाच दिवसांआड तर सोडा, आठ ते दहा दिवसपर्यंत नळाला पाणी येत नाही. वारंवार केलेल्या तक्रारीचीही दखल घेतली जात नाही. ही समस्या आहे वडगाव परिसरातील जांबरोडवर असलेल्या विद्याविहारसह विविध कॉलनी, सोसायटीतील नागरिकांची. 

या परिसराला पाणीपुरवठ्यासाठी बेले ले-आऊटमध्ये नवीनच पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. काही भागाला या टाकीवरून तर काही परिसराला दर्डानगर भागातील टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास प्रत्येक भागात पाणीपुरवठ्यात अनियमितता आहे. नळाचे दिवस ठरलेले नाहीत. सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही पाणी सोडण्यात येते. काही भागात तर दोन तासही पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. 

नळाचे दिवस अधिक असल्याने टाक्या, ड्रम आदी वस्तूंमध्ये पाणी भरून ठेवावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी तर घरात असलेल्या लहान-मोठ्या भांड्यांचा वापर करावा लागतो. किमान तिसऱ्या दिवशी तरी नळ सोडणे अपेक्षित आहे. असे झाले तरच पाण्याची साठवण करण्याची गरज पडणार नाही. या परिसरात असलेली ही समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मांडण्यात आली. प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून आश्वासनेच देण्यात आली. परंतु ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही वसाहतींमध्ये चार दिवसांआड, काही ठिकाणी आठ दिवसांनंतर तर काही भागात दोन-दोन आठवडे पाणी देण्यात येत नाही. हा फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेतील हा दोष आहे. वरिष्ठही गांभीर्याने घेत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 

सात-आठ दिवस पुरवावे लागते पिण्याचे पाणी 

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येत नसल्याने पिण्याचे पाणी सात-आठ दिवस पुरवावे लागते. वडगाव परिसरात असलेल्या जांबरोडवरील विविध नगरातील नागरिकांची ही ओरड आहे.
  • रविराजनगर, समतानगर, शारदानगर, तुकडोजीनगर, सीतारामनगरी, बेले ले- आऊट, आकाशनगर, राठोड ले-आऊट, रुद्राक्ष कॉलनी, विद्याविहार नगरी आदी भागातील नागरिकांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे, या परिसराला लागूनच बेले ले-आऊटमध्ये पाण्याची टाकी आहे.

"आमच्या रविराजनगरात नियमित पाणी मिळत नाही. नळ सोडले तरी वर चढत नाही. कसेबसे दोन तास नळ राहते. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. अशावेळी टँकर घ्यावा लागतो. नळाचा काहीच फायदा होत नाही. आम्ही काय पाण्याचे फक्त बिलच भरत राहायचे का?" - मारोतराव गावराने, रहिवासी

"विद्याविहार कॉलनीमध्ये नळाचे पाणी दोन-दोन आठवडे येत नाही. आले तरी धार अतिशय कमी असते. परिसरातील नागरिकांनी व्यवस्था केलेल्या स्रोतांवरून पाणी मिळत असल्याने तीव्रता जाणवत नाही. मात्र, प्राधिकरणाने नियमित पाणीपुरवठा करावा. केवळ पाण्याचे बिल देऊन मोकळे होऊ नये." - भुमन्ना बोमकंटीवार, रहिवासी 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळ