शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विद्याविहार कॉलनीत दोन-दोन आठवडे नळाला पाणीच येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:13 IST

रविराजनगरात अनियमितता : पाण्याचे फक्त बिलच भरायचे का?

विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नळाचे शुद्ध आणि नियिमत पाणी मिळेल या आशेपोटी नागरिकांनी घरी नळ घेतले. परंतु त्यांची पार निराशा झाली. काही भागात पाच दिवसांआड तर सोडा, आठ ते दहा दिवसपर्यंत नळाला पाणी येत नाही. वारंवार केलेल्या तक्रारीचीही दखल घेतली जात नाही. ही समस्या आहे वडगाव परिसरातील जांबरोडवर असलेल्या विद्याविहारसह विविध कॉलनी, सोसायटीतील नागरिकांची. 

या परिसराला पाणीपुरवठ्यासाठी बेले ले-आऊटमध्ये नवीनच पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. काही भागाला या टाकीवरून तर काही परिसराला दर्डानगर भागातील टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास प्रत्येक भागात पाणीपुरवठ्यात अनियमितता आहे. नळाचे दिवस ठरलेले नाहीत. सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही पाणी सोडण्यात येते. काही भागात तर दोन तासही पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. 

नळाचे दिवस अधिक असल्याने टाक्या, ड्रम आदी वस्तूंमध्ये पाणी भरून ठेवावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी तर घरात असलेल्या लहान-मोठ्या भांड्यांचा वापर करावा लागतो. किमान तिसऱ्या दिवशी तरी नळ सोडणे अपेक्षित आहे. असे झाले तरच पाण्याची साठवण करण्याची गरज पडणार नाही. या परिसरात असलेली ही समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मांडण्यात आली. प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून आश्वासनेच देण्यात आली. परंतु ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही वसाहतींमध्ये चार दिवसांआड, काही ठिकाणी आठ दिवसांनंतर तर काही भागात दोन-दोन आठवडे पाणी देण्यात येत नाही. हा फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेतील हा दोष आहे. वरिष्ठही गांभीर्याने घेत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 

सात-आठ दिवस पुरवावे लागते पिण्याचे पाणी 

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येत नसल्याने पिण्याचे पाणी सात-आठ दिवस पुरवावे लागते. वडगाव परिसरात असलेल्या जांबरोडवरील विविध नगरातील नागरिकांची ही ओरड आहे.
  • रविराजनगर, समतानगर, शारदानगर, तुकडोजीनगर, सीतारामनगरी, बेले ले- आऊट, आकाशनगर, राठोड ले-आऊट, रुद्राक्ष कॉलनी, विद्याविहार नगरी आदी भागातील नागरिकांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे, या परिसराला लागूनच बेले ले-आऊटमध्ये पाण्याची टाकी आहे.

"आमच्या रविराजनगरात नियमित पाणी मिळत नाही. नळ सोडले तरी वर चढत नाही. कसेबसे दोन तास नळ राहते. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. अशावेळी टँकर घ्यावा लागतो. नळाचा काहीच फायदा होत नाही. आम्ही काय पाण्याचे फक्त बिलच भरत राहायचे का?" - मारोतराव गावराने, रहिवासी

"विद्याविहार कॉलनीमध्ये नळाचे पाणी दोन-दोन आठवडे येत नाही. आले तरी धार अतिशय कमी असते. परिसरातील नागरिकांनी व्यवस्था केलेल्या स्रोतांवरून पाणी मिळत असल्याने तीव्रता जाणवत नाही. मात्र, प्राधिकरणाने नियमित पाणीपुरवठा करावा. केवळ पाण्याचे बिल देऊन मोकळे होऊ नये." - भुमन्ना बोमकंटीवार, रहिवासी 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातYavatmalयवतमाळ