शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कार्यालयात; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मात्र जीव जातो खांबावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:28 IST

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : कुटुंब पडते उघड्यावर

यवतमाळ : जिवावर उदार होऊन काम करीत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वीज कंपनीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते. यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्यात घडलेल्या अशा दोन घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

वीज कंपनीत रिक्त असलेल्या रिक्त जागांवर ऑपरेटर आणि तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाते. बाह्यस्रोतांकडून त्यांची भरती होते. दरमहा त्यांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्यांच्याकडून जोखमीची कामे करून घेतली जातात. परंतु, आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. कायम वीज कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून कामे करून घेणे अपेक्षित असतानाच एकट्यालाच खांबांवर चढून त्यांना कामे करावी लागतात.

अशावेळी अपघात झाल्यास त्यांना विदुयत कंपनी अथवा कंत्राटदाराकडून कुठलीही आर्थिक मदत दिली जात नाही. त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या पीएफच्या रकमेवर जे काही व्याज मिळेल, तेवढीच रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळते. नोकरीचा कालावधी पाहून पाच ते बारा हजारांपर्यंत ही रक्कम कुटुंबाला मिळते. शुक्रवारी सिरसगाव पांढरी (ता. नेर) येथे वीज खांबावरच पंकज करडे (रा. खरडगाव) याचा शॉक लागून मृत्यू झाला. याच दिवशी आमटी (ता. पुसद) येथे वीज खांब अंगावर पडून लक्ष्मण पवार या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही कुटुंब उघड्यावर आले आहे.

हे तर... वरिष्ठांच्या निष्काळजीपणाचे बळी

कर्मचाऱ्याने वीज दुरुस्तीसाठी जाताना विद्युत केंद्रात असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. तशी सूचना तेथे कार्यरत कर्मचाऱ्याला द्यावी लागते. काम झाल्याची सूचना मिळाल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करू नये, असे बजावले जाते. परंतु, काम सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा सुरू केला जातो. यात प्रत्यक्ष काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा बळी जातो. कामातील निष्काळजीपणा या घटनांना कारणीभूत असल्याचे अनेक घटनांवरून पुढे आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूYavatmalयवतमाळ