शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधिकारी कार्यालयात; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मात्र जीव जातो खांबावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:28 IST

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : कुटुंब पडते उघड्यावर

यवतमाळ : जिवावर उदार होऊन काम करीत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वीज कंपनीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते. यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्यात घडलेल्या अशा दोन घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

वीज कंपनीत रिक्त असलेल्या रिक्त जागांवर ऑपरेटर आणि तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाते. बाह्यस्रोतांकडून त्यांची भरती होते. दरमहा त्यांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्यांच्याकडून जोखमीची कामे करून घेतली जातात. परंतु, आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. कायम वीज कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून कामे करून घेणे अपेक्षित असतानाच एकट्यालाच खांबांवर चढून त्यांना कामे करावी लागतात.

अशावेळी अपघात झाल्यास त्यांना विदुयत कंपनी अथवा कंत्राटदाराकडून कुठलीही आर्थिक मदत दिली जात नाही. त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या पीएफच्या रकमेवर जे काही व्याज मिळेल, तेवढीच रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळते. नोकरीचा कालावधी पाहून पाच ते बारा हजारांपर्यंत ही रक्कम कुटुंबाला मिळते. शुक्रवारी सिरसगाव पांढरी (ता. नेर) येथे वीज खांबावरच पंकज करडे (रा. खरडगाव) याचा शॉक लागून मृत्यू झाला. याच दिवशी आमटी (ता. पुसद) येथे वीज खांब अंगावर पडून लक्ष्मण पवार या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही कुटुंब उघड्यावर आले आहे.

हे तर... वरिष्ठांच्या निष्काळजीपणाचे बळी

कर्मचाऱ्याने वीज दुरुस्तीसाठी जाताना विद्युत केंद्रात असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. तशी सूचना तेथे कार्यरत कर्मचाऱ्याला द्यावी लागते. काम झाल्याची सूचना मिळाल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करू नये, असे बजावले जाते. परंतु, काम सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा सुरू केला जातो. यात प्रत्यक्ष काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा बळी जातो. कामातील निष्काळजीपणा या घटनांना कारणीभूत असल्याचे अनेक घटनांवरून पुढे आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूYavatmalयवतमाळ