शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अधिकारी कार्यालयात; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मात्र जीव जातो खांबावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:28 IST

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : कुटुंब पडते उघड्यावर

यवतमाळ : जिवावर उदार होऊन काम करीत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वीज कंपनीकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते. यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्यात घडलेल्या अशा दोन घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

वीज कंपनीत रिक्त असलेल्या रिक्त जागांवर ऑपरेटर आणि तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाते. बाह्यस्रोतांकडून त्यांची भरती होते. दरमहा त्यांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्यांच्याकडून जोखमीची कामे करून घेतली जातात. परंतु, आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. कायम वीज कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून कामे करून घेणे अपेक्षित असतानाच एकट्यालाच खांबांवर चढून त्यांना कामे करावी लागतात.

अशावेळी अपघात झाल्यास त्यांना विदुयत कंपनी अथवा कंत्राटदाराकडून कुठलीही आर्थिक मदत दिली जात नाही. त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या पीएफच्या रकमेवर जे काही व्याज मिळेल, तेवढीच रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळते. नोकरीचा कालावधी पाहून पाच ते बारा हजारांपर्यंत ही रक्कम कुटुंबाला मिळते. शुक्रवारी सिरसगाव पांढरी (ता. नेर) येथे वीज खांबावरच पंकज करडे (रा. खरडगाव) याचा शॉक लागून मृत्यू झाला. याच दिवशी आमटी (ता. पुसद) येथे वीज खांब अंगावर पडून लक्ष्मण पवार या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही कुटुंब उघड्यावर आले आहे.

हे तर... वरिष्ठांच्या निष्काळजीपणाचे बळी

कर्मचाऱ्याने वीज दुरुस्तीसाठी जाताना विद्युत केंद्रात असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. तशी सूचना तेथे कार्यरत कर्मचाऱ्याला द्यावी लागते. काम झाल्याची सूचना मिळाल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करू नये, असे बजावले जाते. परंतु, काम सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा सुरू केला जातो. यात प्रत्यक्ष काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा बळी जातो. कामातील निष्काळजीपणा या घटनांना कारणीभूत असल्याचे अनेक घटनांवरून पुढे आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूYavatmalयवतमाळ