शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

यवतमाळ वनविभागातील आयएफएस अभर्णा, ‘ना खाऊंगी ना खाने दूंगी’ ;   भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:31 AM

थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा वनविभाग भ्रष्ट वन अधिकाऱ्यांची दुकानदारी बंदलॉबिंगचा प्रयत्न, यवतमाळातून साथ

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘दुकानदारी’च बंद झाल्याने या अधिकाऱ्यांनी आता सदर महिला अधिकाऱ्याला वेगळे पाडण्यासाठी आपली लॉबिंग सुरू केली असून त्याला यवतमाळातूनही भक्कम साथ मिळत असल्याचे सांगितले जाते.पांढरकवडा वन विभागाला के. अभर्णा यांच्या रुपाने थेट आयएफएस असलेल्या अधिकारी सलग लाभल्या आहेत. त्यांची यापूर्वीची सेवा आसाममधील देशातील सर्वात मोठ्या काझीरंगा अभयारण्यात झाली आहे. त्या तुलनेत पांढरकवड्यातील आव्हान त्यांच्यापुढे अगदीच छोटे आहे. के. अभर्णा यांनी ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या पध्दतीने पांढरकवडा वन विभागातही कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या परंपरागत भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या शिकारी, सागवानाची अवैध वृक्षतोड या सारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता आपला वेगळा गट बनवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळवन प्रशासनाची दिशाभूल करून पोलिसांना जंगल फिरविणारा एक वनअधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ ठोकून आहे. पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. काँग्रेसच्या एका दिवंगत नेत्याशी असलेल्या नातेसंबंधाच्या बळावर या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी पांढरकवड्यात मुदतवाढ मिळविली होती. आताही सत्ताधारी भाजपाच्या आर्णी व राळेगावातील आमदारांची मर्जी सांभाळून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सेवेत राहण्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते.

नुकसानभरपाई धनादेश विलंबानेवाघाने हल्ला केल्याच्या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईचे धनादेश तातडीने देण्याचे आदेश आयएफएस अभर्णा यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून तब्बल दीड महिना विलंबाने हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्याचे श्रेय आमदारांना मिळावे म्हणून धनादेश वाटपाचा हा कार्यक्रम कालपर्यंत लांबणीवर टाकला गेला. एरव्ही वाघाने हल्ला करूनही मृताच्या घरी भेटी देण्याची फारशी तसदी न घेणारे वरिष्ठसुद्धा गुरुवारी झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयएफएस अभर्णा मात्र अनुपस्थित होत्या.

बोगस व्हाऊचर, रॉयल्टीला चापके. अभर्णा यांच्या ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या कारभारामुळे पांढरकवडा वन विभागातील भ्रष्टाचार बराच कमी झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतींना, बोगस व्हाऊचरद्वारे पैसे काढण्याच्या प्रकाराला, रॉयल्टी पॅटर्नला चाप लावला आहे. त्यांनी वन खात्याला शिस्त लावली. त्या स्वत:ही दिवसा आणि रात्रीसुद्धा अचानक जंगलात गस्तीसाठी निघतात. त्यामुळे वन खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ आहे. या लॉबीने आता आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातून ‘आयएफएस’ला वेगळे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. या प्रयत्नांना यवतमाळातूनसुद्धा भक्कम साथ मिळत असल्याचीही चर्चा आहे.

वाघाच्या हल्ल्याचा सूक्ष्म अभ्यासके. अभर्णा यांच्या अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव वाघांच्या हल्ल्याच्या घटनेतून आला. पांढरकवडा विभागात वाघाने शिकार केल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना या के.अभर्णा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये त्यांनी मृताच्या अंगावर वाघाचे पडलेले केस, लाळ याचे नमुने घेऊन बंगलोर व हैदराबादला तपासणीसाठी पाठविले. त्या आधारे नेमक्या कोणत्या वाघाने शिकार केली, हे शोधण्यात आले. अशा पद्धतीने यापूर्वी अनेक हल्ले होऊनही कधीच सूक्ष्म तपासणीचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. एवढे हल्ले होऊनही यापुर्वी वाघाला पकडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले गेले नव्हते.

घातपाताचा टर्न अन् पोलीस जंगलातइकडे पाठोपाठ हल्ले होत असल्याने संबंधित एका वन अधिकाऱ्यावर बदली, निलंबन यासारखी कठोर कारवाई होऊ घातली होती. म्हणूनच की काय त्यापासून वन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रकरणात वाघाने शिकार केलेली असताना घातपात भासविण्याचा प्रयत्न वनअधिकाऱ्यांकडून झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील संपूर्ण जंगल छानून काढले. मात्र तो घातपात नव्हे, तर वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यातील मृत्यूच असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग