एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मे हिटचा तडाखा

By Admin | Updated: April 5, 2016 04:45 IST2016-04-05T04:45:40+5:302016-04-05T04:45:40+5:30

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने ४२ पार केली. साधारणत: मे महिन्याच्या

I hit the hit in the first week of April | एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मे हिटचा तडाखा

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मे हिटचा तडाखा

रुपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने ४२ पार केली. साधारणत: मे महिन्याच्या सुरुवातीला पारा ४२ ते ४४ अंशावर असतो. परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना मे हिटचा सामना करावा लागत आहे.
अंगाची लाहीलाही करणारे उन्ह तापत असल्याने दुपारी शहरातील रस्ते निर्मुष्य झालेले दिसतात. रात्रीही उशिरापर्यंत उन्हाच्या झळा बसतात. यवतमाळ जिल्ह्यातील गत काही वर्षातील एप्रिल आणि मे महिन्याच्या तापमानावर नजर टाकल्यास यंदाचा उन्हाळा अतिशय कठीण जाईल, अशी अवस्था आहे. २००८ साली एप्रिल महिन्याच्या १५ तारखेनंतर तापमान ४० अंशावर पोहोचले होते. मे महिन्याच्या अखेरीस पारा ४२ अंशापर्यंत गेला होता. २००९ मध्ये चित्र बदलले. १२ ते १५ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट आली होती. परंतु पारा ४० अंशापर्यंतच स्थिर झाला होता. २०१० मध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. पारा ४३ अंशापर्यंत पोहोचला होता. तर २०११ आणि २०१२ मध्ये एप्रिल महिन्यात दुसऱ्या आठवड्यात तापमान ४१ अंशावर पोहोचले होते. २०१३ मध्ये तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने ४० शी पार केली होती. २०१४ मध्येही अशीच अवस्था होती. २०१५ मध्ये एप्रिलच्या अखेरीस पारा ४२ अंशावर गेला होता. गत काही वर्षातील तापमानाची आकडेवारी आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापणारे उन्ह पाहता मे महिन्यात पारा ४६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उष्णतेच्या लोटेने सर्वत्र तापमानात वाढ होत आहे. सोमवार ४ एप्रिल २०१६ रोजी यवतमाळात ४२.५ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली. ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे मत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. सूर्याचा उत्तरायणात प्रवेश झाल्याने तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगने कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आली आहे. या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. विशेष म्हणजे शहरी भागात तापमान अधिक जाणवत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात तापमान २ अंशाने अधिक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची ही दाहकता आणखी किती वाढणार याचा अंदाज कुणालाही येत नसून उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्वच जण धडपड करताना दिसत आहे. घरोघरी लागलेले कुलरही तापमानापुढे थिटे पडत आहे. तर उन्हाच्या वाढत्या पाऱ्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.

Web Title: I hit the hit in the first week of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.