शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

वन्यप्राण्यांकडून शेकडो हेक्टर जमिनीतील पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:44 IST

पांढरकवडा : तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरिपातील पिके समाधानकारक असताना रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे ...

पांढरकवडा : तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरिपातील पिके समाधानकारक असताना रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे आम्ही शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ आणि पावसाचा अनियमितपणा आदींचा सामना करीत असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेती उभी केली. तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने व नंतरही समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर ही खरिपातील पिके डोलू लागली. असे असतानाच तालुक्यातील वाऱ्हा कवठा, भाडउमारी, वांजरी, सुन्ना, ढोकी, बल्लारपूर, साखरा, बोथ, बहात्तर या परिसरासोबतच आता सखी, वाढोणा, करंजी, अडणी, वाठोडा, चनाई, खातारा, सिंगलदीप परिसरातदेखील रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून शेतमालाची नासधूस करीत आहेत. या वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याबरोबरच रानडुक्कर व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणे दुरापास्त झाले आहे. मागील दीड वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी झाली आहे. हिरव्याकंच पिकात धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

बॉक्स : टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत हवी

टिपेश्वर अभयारण्याला लागून सुन्ना, कोपामांडवी, अंधारवाडी, कोबई, वाऱ्हा, कवठा, बल्लारपूर, वांजरी, अर्ली, पिंपळशेंडा, पिटापुंगली, कारेगाव बंडल, दर्यापूर, वडवाट, धरमगोटा व झरी तालुक्यातील पिवरडोल, मांडवी, जुनोनी पोड व परंबा कारेगाव आदी गावात वाघांची प्रचंड दहशत आहे. टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत नसल्याने वन्यप्राणी सहजपणे शेतकऱ्यांच्या शेतात येतात आणि काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करतात. तसेच जनावरेसुद्धा फस्त करतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे.