शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वन्यप्राण्यांकडून शेकडो हेक्टर जमिनीतील पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:44 IST

पांढरकवडा : तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरिपातील पिके समाधानकारक असताना रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे ...

पांढरकवडा : तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरिपातील पिके समाधानकारक असताना रोही, रानडुकरे आदी वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे आम्ही शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ आणि पावसाचा अनियमितपणा आदींचा सामना करीत असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेती उभी केली. तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने व नंतरही समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर ही खरिपातील पिके डोलू लागली. असे असतानाच तालुक्यातील वाऱ्हा कवठा, भाडउमारी, वांजरी, सुन्ना, ढोकी, बल्लारपूर, साखरा, बोथ, बहात्तर या परिसरासोबतच आता सखी, वाढोणा, करंजी, अडणी, वाठोडा, चनाई, खातारा, सिंगलदीप परिसरातदेखील रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून शेतमालाची नासधूस करीत आहेत. या वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याबरोबरच रानडुक्कर व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणे दुरापास्त झाले आहे. मागील दीड वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी झाली आहे. हिरव्याकंच पिकात धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

बॉक्स : टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत हवी

टिपेश्वर अभयारण्याला लागून सुन्ना, कोपामांडवी, अंधारवाडी, कोबई, वाऱ्हा, कवठा, बल्लारपूर, वांजरी, अर्ली, पिंपळशेंडा, पिटापुंगली, कारेगाव बंडल, दर्यापूर, वडवाट, धरमगोटा व झरी तालुक्यातील पिवरडोल, मांडवी, जुनोनी पोड व परंबा कारेगाव आदी गावात वाघांची प्रचंड दहशत आहे. टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत नसल्याने वन्यप्राणी सहजपणे शेतकऱ्यांच्या शेतात येतात आणि काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करतात. तसेच जनावरेसुद्धा फस्त करतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे.