शेकडो कुटुंबांना भोगाव्या लागताहेत नरकयातना

By Admin | Updated: July 14, 2015 01:53 IST2015-07-14T01:53:20+5:302015-07-14T01:53:20+5:30

सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात

Hundreds of families are suffering from hellfire | शेकडो कुटुंबांना भोगाव्या लागताहेत नरकयातना

शेकडो कुटुंबांना भोगाव्या लागताहेत नरकयातना

यवतमाळ : सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रेल्वे रुळालगत असलेल्या वसाहतींमधील नागरिक मागील काही वर्षांपासून या जीवघेण्या समस्येला तोंड देत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी मात्र याविषयी तोंड उघडायला तयार नाही. या उलट नवीन सदनिकांना परवानगी दिली जात आहे.
या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. बिल्डर्सकडून मात्र नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. वार्ड क्र. पाच अंतर्गत राऊत नगरातील सदनिकांमधील सांडपाणी रेल्वे रुळाकडे सोडून देण्यात आले आहे. याठिकाणी मोठे गटार तयार झाले आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय महावीरनगर परिसरात असलेल्या सदनिकांच्या सांडपाण्यानेही यामध्ये भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी तर या पाण्यामुळे खुल्या प्लॉटला गटाराचे स्वरूप आले होते. काही उपाय योजना केल्याने ते रुळालगत थांबविण्यात आले. मात्र डासांचा प्रादुर्भाव या भागातील नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. शिवाय या ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या इतर भागातील सदनिकांचीही स्थिती यापेक्षा वेळी नाही.
सांडपाण्याचे मोठमोठे लोट नागरिकांच्या घरासमोरून वाहतात. ग्रामपंचायतीकडून थातूरमातूर साफसफाई केली जाते. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी वास्तव्याला असलेल्या भागातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. (वार्ताहर)

यवतमाळ : सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रेल्वे रुळालगत असलेल्या वसाहतींमधील नागरिक मागील काही वर्षांपासून या जीवघेण्या समस्येला तोंड देत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी मात्र याविषयी तोंड उघडायला तयार नाही. या उलट नवीन सदनिकांना परवानगी दिली जात आहे.
या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. बिल्डर्सकडून मात्र नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. वार्ड क्र. पाच अंतर्गत राऊत नगरातील सदनिकांमधील सांडपाणी रेल्वे रुळाकडे सोडून देण्यात आले आहे. याठिकाणी मोठे गटार तयार झाले आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय महावीरनगर परिसरात असलेल्या सदनिकांच्या सांडपाण्यानेही यामध्ये भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी तर या पाण्यामुळे खुल्या प्लॉटला गटाराचे स्वरूप आले होते. काही उपाय योजना केल्याने ते रुळालगत थांबविण्यात आले. मात्र डासांचा प्रादुर्भाव या भागातील नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. शिवाय या ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या इतर भागातील सदनिकांचीही स्थिती यापेक्षा वेळी नाही.
सांडपाण्याचे मोठमोठे लोट नागरिकांच्या घरासमोरून वाहतात. ग्रामपंचायतीकडून थातूरमातूर साफसफाई केली जाते. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी वास्तव्याला असलेल्या भागातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. (वार्ताहर)
लोहारा ग्रामपंचायतीची जुनी वस्ती वगळता इतर कुठल्याही भागात अपवादानेही सांडपाण्याच्या नाल्या तयार झालेल्या नाही. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डे तयार करून सांडपाणी मुरविण्याचे केलेले प्रयोगही काही दिवसानंतर निकामी होत आहे. परिणामी जागोजागी गटारं तयार झाले आहेत.

Web Title: Hundreds of families are suffering from hellfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.