शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

नेर, यवतमाळला झोडपले; निळोणा तुडुंब, बेंबळाचेही दरवाजे उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:44 IST

नेरमध्ये १०९ तर यवतमाळ तालुक्यात ६३ मिमी पाऊस : बाभूळगावसह कळंब, दारव्हा तालुक्यातही जोर

यवतमाळ : महिनाभराच्या विलंबाने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले, तरी मागील काही दिवसांत पावसाने दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी (दि. १३) सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली असून, तेथे १०० मिमी पाऊस कोसळला आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरल्याने बळीराजा पेरणीला लागला आहे.

जिल्ह्यातील साधारण: ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. विशेषत: संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांत रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०० मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून, त्यापाठोपाठ ६३.५ मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली आहे. बाभूळगाव, कळंब, दारव्हासह मारेगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. बुधवारप्रमाणेच गुरुवारी, तसेच शुक्रवारीही जिल्ह्यात पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे उघडून २५ सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, वणीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने निकृष्ट रस्त्याचे पितळ पाडले उघडे

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यातही मागील दोन-तीन दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत ३३३.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून, एकूण पावसाच्या ती २४.६ टक्के इतकी आहे; मात्र या पावसात यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सोसावा लागत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ