शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नेर, यवतमाळला झोडपले; निळोणा तुडुंब, बेंबळाचेही दरवाजे उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:44 IST

नेरमध्ये १०९ तर यवतमाळ तालुक्यात ६३ मिमी पाऊस : बाभूळगावसह कळंब, दारव्हा तालुक्यातही जोर

यवतमाळ : महिनाभराच्या विलंबाने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले, तरी मागील काही दिवसांत पावसाने दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी (दि. १३) सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान, यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली असून, तेथे १०० मिमी पाऊस कोसळला आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरल्याने बळीराजा पेरणीला लागला आहे.

जिल्ह्यातील साधारण: ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहेत. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. विशेषत: संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांत रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०० मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून, त्यापाठोपाठ ६३.५ मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली आहे. बाभूळगाव, कळंब, दारव्हासह मारेगाव तालुक्यातही दमदार पाऊस झाला.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. बुधवारप्रमाणेच गुरुवारी, तसेच शुक्रवारीही जिल्ह्यात पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता या प्रकल्पाचे दोन वक्र दरवाजे उघडून २५ सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, वणीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने निकृष्ट रस्त्याचे पितळ पाडले उघडे

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यातही मागील दोन-तीन दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत ३३३.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून, एकूण पावसाच्या ती २४.६ टक्के इतकी आहे; मात्र या पावसात यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सोसावा लागत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ