शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

ऑफलाईन विम्यावर भरोसा ठेवायचा कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यांपुढे येतात. यावर्षी अनेक शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रश्न : मागील वर्षी बँकांनी फेटाळले अर्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ दिवसांची मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऑनलाईन पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे. दरवर्षीप्रमाणे पीक विम्याची साईड अतिशय संथगतीने काम करत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन विमा काढण्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पुढील १५ दिवस ऑफ लाईन विमा काढण्याचे निर्देश बँकांना दिले आहे. मागील वर्षीसुद्धा याच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी ऑफलाईन विमा काढला होता. मात्र बँकांनी नंतर ऐनवेळी सर्व्हिस चार्ज कापून विम्याचा अर्ज फेटाळला. आता या ऑफलाईन विम्यावर भरोसा ठेवायचा कसा, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यांपुढे येतात. यावर्षी अनेक शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक आहे. मात्र प्रक्रियेतील अडचणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ३१ जुलैपर्यंत इच्छुक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे विमा काढता येणार नाही, हे निश्चित आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सोमवारी विमा काढण्याला मुदतवाढ दिली आहे. या विम्याचे अर्ज बँकांना स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ऑनलाईन शक्य नसल्यास ऑफलाईन विमा काढण्याचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. असाच कित्ता मागील वर्षी २०१८-१९ च्या हंगामात घडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी ऑफ लाईन विमा काढला. बँकांनी पीक विम्याचे अर्ज स्वीकारले. नंतर काही दिवसातच पीक विमा कंपन्या ऑफलाईन अर्ज स्वीकारत नाही, अशी सबब पुढे करून शेतकऱ्यांचे अर्ज परत केले. मागील वर्षीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव मुदतीचा आदेश दिला होता. आता सुद्धा तोच प्रकार होणार काय, अशी शंका आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बँका जुमानत नसेल व विमा कंपनी मानत नसेल तर दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना विमा कंपनी व बँकांची धास्तीमागील वर्षी विमा कंपनी व बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता ऑफलाईन अर्ज ऐनवेळेवर परत केले. यात शेतकºयांचेच दुहेरी नुकसान झाले. बँकांनी ऑफलाईन अर्ज परत करताना सर्व्हिस चार्ज कापून रक्कम शेतकऱ्यांच्या हातात ठेवली. पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पिकांची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला. अगदी तशीच स्थिती आता निर्माण होईल का, याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती