शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

ऑफलाईन विम्यावर भरोसा ठेवायचा कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यांपुढे येतात. यावर्षी अनेक शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रश्न : मागील वर्षी बँकांनी फेटाळले अर्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ दिवसांची मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ऑनलाईन पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे. दरवर्षीप्रमाणे पीक विम्याची साईड अतिशय संथगतीने काम करत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन विमा काढण्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पुढील १५ दिवस ऑफ लाईन विमा काढण्याचे निर्देश बँकांना दिले आहे. मागील वर्षीसुद्धा याच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी ऑफलाईन विमा काढला होता. मात्र बँकांनी नंतर ऐनवेळी सर्व्हिस चार्ज कापून विम्याचा अर्ज फेटाळला. आता या ऑफलाईन विम्यावर भरोसा ठेवायचा कसा, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा काढण्यासाठी सीसीएससी सेंटरवर जावे लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र गावखेड्यात इंटरनेटचा स्पीड मिळत नाही. एकाचवेळी शेतकरी विमा काढण्यासाठी जात असल्याने साईड हँग होते. अशा एक ना अनेक अडचणी विमा काढताना शेतकऱ्यांपुढे येतात. यावर्षी अनेक शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक आहे. मात्र प्रक्रियेतील अडचणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ३१ जुलैपर्यंत इच्छुक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे विमा काढता येणार नाही, हे निश्चित आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सोमवारी विमा काढण्याला मुदतवाढ दिली आहे. या विम्याचे अर्ज बँकांना स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ऑनलाईन शक्य नसल्यास ऑफलाईन विमा काढण्याचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. असाच कित्ता मागील वर्षी २०१८-१९ च्या हंगामात घडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी ऑफ लाईन विमा काढला. बँकांनी पीक विम्याचे अर्ज स्वीकारले. नंतर काही दिवसातच पीक विमा कंपन्या ऑफलाईन अर्ज स्वीकारत नाही, अशी सबब पुढे करून शेतकऱ्यांचे अर्ज परत केले. मागील वर्षीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव मुदतीचा आदेश दिला होता. आता सुद्धा तोच प्रकार होणार काय, अशी शंका आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बँका जुमानत नसेल व विमा कंपनी मानत नसेल तर दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना विमा कंपनी व बँकांची धास्तीमागील वर्षी विमा कंपनी व बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता ऑफलाईन अर्ज ऐनवेळेवर परत केले. यात शेतकºयांचेच दुहेरी नुकसान झाले. बँकांनी ऑफलाईन अर्ज परत करताना सर्व्हिस चार्ज कापून रक्कम शेतकऱ्यांच्या हातात ठेवली. पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पिकांची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला. अगदी तशीच स्थिती आता निर्माण होईल का, याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती