शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

यवतमाळातील ११ कोटींच्या भूखंड खरेदीचा तपास फौजदाराकडे कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 07:00 IST

यवतमाळातील ११ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या दीड कोटी रुपयात आणि तोही बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास चक्क फौजदाराकडे असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देएलसीबी, एसडीपीओ, ईओडब्ल्यूचा पर्याय ‘म्होरके’ रेकॉर्डवर आणण्याचे पोलिसांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ११ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या दीड कोटी रुपयात आणि तोही बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास चक्क फौजदाराकडे असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यवतमाळ राजकीय वरदहस्त असल्याने जणू भूमाफियांचे प्रमुख केंद्र बनला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या भूखंड घोटाळ्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात १५ ते १७ जणांना अटक केली गेली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी खास ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन करून त्याची सूत्रे यवतमाळच्या एसडीपीओंकडे देण्यात आली होती.

या घोटाळ्यातही बेवारस भूखंड बनावट कागदपत्रे बनवून परस्पर खरेदी करीत बँकांना तारण ठेवला गेला होता. या प्रकरणात बँकाच फसविल्या गेल्या. मात्र त्यानंतरही बँकांनी एफआयआर देण्याची तसदी घेतली नाही. उलट फसवणूक झालेली रक्कम आपल्या स्तरावर ‘एनपीए’मध्ये अ‍ॅडजेस्ट करून जणू भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण दिले.त्याच घोटाळ्याशी साधर्म्य असलेले यवतमाळच्या श्रोत्री हॉस्पिटल चौकातील अ‍ॅड. काजी सैय्यद करीमुद्दीन यांच्या भूखंडाचे आणखी एक प्रकरण पुढे आले. देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेशातून आमदार व खासदार राहिलेल्या काजी यांचा भूखंड बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर खरेदी केला गेला. पोलिसांनी या भूखंडाची किंमत ११ कोटी रुपये निश्चित केली असली तरी प्रत्यक्षात प्रचलित बाजारभावाने ही किंमत या पेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली.

या गुन्ह्याचा तपास अवधूतवाडीतील एका फौजदाराकडे आहे. वास्तविक ११ कोटींचे प्रकरण व त्याची व्याप्ती लक्षात घेता या गुन्ह्याचा तपास किमान स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय अधिकारी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे देणे अपेक्षित आहे. कारण या गुन्ह्यात रेकॉर्डवर दिसणारे आरोपी नाममात्र आहेत. प्रत्यक्षात त्यांचे रिमोट शहरातील भूमाफियांच्या हाती आहे. या भूमाफियांना भक्कम राजकीय संरक्षण आहे.त्यामुळे या म्होरक्यांची नावे रेकॉर्डवर आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी फौजदार सक्षम ठरत नसून किमान एसडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी होत आहे.

फिर्यादीचा राजकीय गोतावळा, भूमाफियांचा पर्दाफाश होण्याची चिन्हेअ‍ॅड. काजी यांचे वारसदार मोईन काजी रा. आकारनगर काटोल रोड, नागपूर यांनी या प्रकरणात मुखत्यार म्हणून सै.हबीबूल हसन काद्री यांना नियुक्त केले आहे. त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीचा राजकीय गोतावळा नागपुरात मोठा आहे. विधान परिषद सदस्य व इतरांचेही त्यांना पाठबळ आहे. त्यामुळेच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकला असे मानले जाते. या राजकीय पाठबळामुळेच ११ कोटींच्या या भूखंड प्रकरणात पडद्यामागील म्होरके रेकॉर्डवर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या म्होरक्यांनी यवतमाळात बेवारस व वादग्रस्त-अडचणीतील अशा अनेक रियेल इस्टेटची नाममात्र रकमेत विल्हेवाट लावल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात भूमिअभिलेख विभागाची यंत्रणाही गुंतलेली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या यंत्रणेपर्यंत पोहोचणे, कारवाईसाठी वरिष्ठांची परवानगी घेणे, म्होरक्यांना हातकड्या घालणे याकरिताच या प्रकरणाचा तपास वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :mafiaमाफिया