शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

इंदिरा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:53 PM

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देविविध उपक्रम : जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. येथील वडगाव रोडवरील ओम सोसायटीत झालेल्या या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. इंदिराजीव पारमार्थिक ट्रस्ट आणि ओम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.इंदिराजी जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर, सामान्य ज्ञान स्पर्धा, विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया महिलांचा गुणगौरव आदी कार्यक्रम पार पडले. शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते.प्रज्ञाताई चौधरी, रजनीताई शिर्के, साधना उमेश आडे, सुषमा प्रमोद गाढवे, सुनैना अजात, कांताबाई रमेश सुने, संगीता ठाकरे, सरोज देशमुख, शबाना परवीन, समीर शेख या महिलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ना. माणिकराव ठाकरे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. इंदिरा गांधी यांनी अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करीत देशाला प्रगतीपथावर नेणारे धोरणात्मक निर्णय घेतले. गोरगरीब लोकांचे जीवनमान या धोरणामुळे उंचावले, असे ते म्हणाले.वणी येथील प्रा.डॉ. अजय देशपांडे यांचे मार्गदर्शन झाले. सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार उराशी बाळगणाºया इंदिराजींनी सातत्याने राष्टÑहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता, असे ते म्हणाले.माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदींनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक इंदिराजीव आणि ओम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. संचालन कैलास राऊत, प्रा. घनश्याम दरणे, बापू देशमुख यांनी केले. आभार अरुण राऊत यांनी मानले.कार्यक्रमाला आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी मंत्रीद्वय शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषद सभापती नंदिणी दरणे, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दर्डा, बाळासाहेब चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, विद्याताई देशमुख, संध्याताई सव्वालाखे, नगरसेविका उषा दिवटे, प्रफुल्ल मानकर, अशोक घारफळकर, सुरेश चिंचोळकर, वसंत घुईखेडकर, पुष्पा नागपुरे, वनिता देशमुख, अशोक बोबडे, प्रा. शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, जीवन पाटील, सुभाष पाटील कदम, अनिल गायकवाड, अर्चना धर्मे, मीनाक्षी वेट्टी, अविनाश देशमुख, दिनेश गोगरकर, प्रा. शिर्के, प्रा. राठोड, पंकज देशमुख, बाबू पाटील वानखडे, बाळू काळे, बालू पाटील दरणे, आनंदराव जगताप, एकनाथराव डगवार, राजू निलावार, सतीश बनगीनवार, सुनील काळे, बाळासाहेब सरोदे, आनंद बेंद्रे, निखिल गायकवाड, विवेक दौलतकर, अरविंद वाढोणकर, अमोल गिते, मंगेश गोगरकर, काटोले आदी उपस्थित होते.सामान्य ज्ञान स्पर्धाइंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर तीन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात सहाशेवर विद्यार्थी सहभागी झाले होते. गटनिहाय तीन, दोन व एक हजार रुपयांचे बक्षीस पहिल्या तीन क्रमांकाना देण्यात आले. प्रत्येक गटात प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.