लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : करंजी महामार्गपोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४० हजार २२० वाहनांवर कारवाई करून एका वर्षात दोन कोटी २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली. अप्पर पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, विकास खडसे, फुलसिंग राठोड, दुर्गाप्रसाद मिश्रा, सुभाष राठोड व सहकाऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या एक वर्षात वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सीट बेल्टचा वापर न करणे, अतिवेगात वाहन चालविणे, लेन कटींग, नो पार्किंगच्या ४० हजार २२० केसेस केल्या आहेत. यातून पोलिसांनी दोन कोटी २१ लाख ७६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. शेवटच्या डिसेंबर या एका महिन्यात ५४ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.
महामार्ग पोलिसांची ४० हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST
राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली.
महामार्ग पोलिसांची ४० हजार वाहनांवर कारवाई
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : वर्षभरात दोन कोटी २१ लाखाचा दंड वसूल