शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

हवामान आधारित विम्याची मदत तुटपुंजी

By admin | Updated: February 19, 2015 00:04 IST

राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत शासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामान आधारित पीक विमा योजना राबविली.

दारव्हा : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत शासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामान आधारित पीक विमा योजना राबविली. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा विमा उतरविला. शेतकऱ्यांनी कपाशीसाठी ११७९ रुपये, सोयाबीन ८५५ रुपये, मूग ५६४ रुपये आणि उडीदासाठी ७२० रुपये हेक्टरी विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला. मात्र जाहीर झालेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. विमा कंपनीने नियमाची पायमल्ली केली आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून रक्कम भरुन घेतल्यानंतर प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर हवामानाच्या नोंदी तपासण्यासाठी संदर्भ हवामान केंद्र उभारणे नियमानुसार आवश्यक होते. ही व्यवस्था केलीच नाही शिवाय नजीकच्या हवामान केंद्राची आकडेवारी विचारात घेऊनही नुकसान भरपाई निश्चित केली नाही. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी आदी हवामान बदलाच्या नोंदी तपासून महसूल मंडळ निहाय नुकसानभरपाई निश्चित करणे बंधनकारक होते. मात्र कंपनीने या सर्व अटी-शर्थी डावलून तुटपुंजी नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या माथी मारली.तालुक्यातील मांगकिन्ही महसूल मंडळात जूनमध्ये दहा मिमी, जुलै १२७ मिमी, आॅगस्ट १६४, सप्टेंबरमध्ये ९४ आणि आॅक्टोबर महिन्यात शून्य मिमी असा एकूण ३९५ मिमी अत्यल्प पाऊस झाला. या चार महिन्याच्या कालावधीत पावसात अनेकदा खंड पडला. मांगकिन्ही मंडळाच्या हवामान नोंदीच्या आधारे विमा कंपनीस कापूस २२ हजार, सोयाबीन १९ हजार, मूग १५ हजार, उडीद १५ हजार रुपये नुकसानीची रक्कम देय असताना विमा कंपनीने कापूस दोन हजार ३५४, सोयाबीन एक हजार ४२५, मूग ९४७ आणि उडीद एक हजार ४०० रुपये अशी नियमबाह्य नुकसानीची रक्कम मंजूर केली आहे. कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे भीमराव राठोड यांनी सांगितले. दरम्यान इंदल पवार, धरम जाधव, राजू पवार, अरविंद जाधव, रामराव राठोड या शेतकऱ्यांनीही सदर प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)