यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

By विशाल सोनटक्के | Published: July 13, 2022 03:13 PM2022-07-13T15:13:24+5:302022-07-13T15:18:33+5:30

जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

heavy rains hit Yavatmal district, More than 65 mm of rainfall was recorded in 55 circles | यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

Next
ठळक मुद्दे२४ तासात ६९.७ मिमी पाऊस

यवतमाळ : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळल्यानंतर मध्यरात्री पावसाने आणखी जोर धरला. हा पाऊस पहाटेपर्यंत सर्वदूर कोसळत होता. यंदा प्रथमच संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून २४ तासात तब्बल ६९.७ मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली आहे.

यवतमाळ तालुक्यात सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ४७.८ मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव ५१.३, कळंब ५१.२, दारव्हा ६३.३, दिग्रस ५४.२, आर्णी ७५.४, नेर ४७.२, पुसद ६५.५, उमरखेड १३२.३, घाटंजी ४०.१, राळेगाव ६३.५, महागाव १०९.१, वणी ७८.६, मारेगाव ४९.२, केळापूर ८६.७ तर झरी जामणी तालुक्यात सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात तब्बल १०५.५ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

बेंबळासह सायखेडा, अधरपूसमधूनही पाण्याचा विसर्ग

मंगळवारी दिवसभर जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने बेंबळासह सायखेडा आणि अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा प्रकल्पात बुधवारी सकाळी ४६.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. तर सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ६९.३८ घनसेमीने पाणी सोडण्यात येत आहे. अधरपूस प्रकल्पातही ५९.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ५० घनसेमीने पाणी सोडण्यात आले आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 

दराटी, पिरंजी व तरोडा लघु प्रकल्प तुडुंब

जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. पाटबंधारे उपविभाग क्र. ४ महागाव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता दराटी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पिरंजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तरोडा प्रकल्पही शंभर टक्के भरला असून या तीनही प्रकल्पातून सांडवा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी दराटी लघु प्रकल्पातून १५ सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर पिरंजीमधून १० आणि तरोडा प्रकल्पातून ५ सेमीने सांडवा विसर्ग सुरू होता.

Web Title: heavy rains hit Yavatmal district, More than 65 mm of rainfall was recorded in 55 circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.