शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा 829 गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सलग सात दिवस बरसलेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना झोडपून काढले. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतशिवारात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. या नैसर्गिक प्रकोपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख पेक्षाही अधिक क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक हानीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ ते १४ जुलैपर्यंत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हे नुकसान भरून न निघणारे असेच आहे. यवतमाळ जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. कमी वेळात अधिक पाऊस बरसल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात गाळ वाहून आल्याने उभे असलेेले पीक भूईसपाट झाले. याठिकाणी आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. पेरणीचा कालावधी संपल्याने कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ७२ हजार ३१७ हेक्टरला याचा फटका बसला आहे. तर ३९ हजार १७३ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक भुईसपाट झाले आहे. १० हजार २८६ हेक्टरवरील तूर जळून गेली आहे. 

भाजीपाला आणि फळपिकांना फटका- १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला कचऱ्याप्रमाणे फेकून द्यावा लागला. सततच्या पावसाने फळपिकांची फुलगळ झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाने रेकाॅर्ड मोडला - जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचा पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला आहे. हा पाऊस क्षमतेपेक्षा अधिक असल्याने पिकांच्या वाढीला फटका बसेल. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती