शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:49 IST

गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला.

ठळक मुद्देपूस नदी फुगली : धरणात ३३ टक्के जलसाठा, नदी-नाले खळखळले

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. चार तास बरसलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून पुसद शहराची जीवनदायिनी पूस नदी दुथडी भरून वाहात आहे, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे.मृगनक्षत्राच्या सुरुवातीला पुसद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० जूनपासून पावसाने दडी मारली. पेरणी झालेले शेतकरी धास्तावले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अनेकांचे पेरलेले बियाणे अंकुरून जळू लागले होते. या प्रकाराने शेतकरी बेचैन झाले होते. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. वारा शांत असल्याने जलधारांनी वेग घेत काही वेळातच संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले. पूस नदी ओसंडून वाहू लागली. यंदा पूस नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने निर्मळ पूस वाहताना पाहून पुसदकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पाऊस आणखी थोडा झाला असता तर पूस नदीच्या पुलावरून वाहू लागले असते. भिलवाडीचा पूल, हत्ती पुलावरून पाणी वाहात होते. तालुक्यातील चोंढी, बान्सी, सावंगी, वनवार्ला, वालतूर रेल्वे, वरूड, सांडवा, मांडवा, बोरी या भागात नदी नाल्यांना पूर आला. अनेकांच्या शेतात पाणी शिरले.पुसद शहरात रात्रभरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २८० मिमी पाऊस तालुक्यात पडला आहे. पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे. पूस नदीला पहिला पूर आला असून येत्या १५ दिवसात पुसदकरांना नियमित पाणीपुरवठा होईल, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली. रात्रीच्या पावसाने चोंढी येथील माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या शेतातील हळद पीक वाहून गेले. नदीकाठावरील अनेक शेतात पाणी शिरल्याने बियाणे वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र या पावसाचा फायदा नळयोजनेसह गावातील विहिरींच्या पाणीपातळी वाढण्यात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.शेतकरी सुखावलेदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पुसद तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले होते. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या पावसाने पेरणी उलटण्याची भीती नाहिशी झाली असून निघालेल्या बियाण्यांना पोषक होणार आहे.

टॅग्स :riverनदीRainपाऊस