शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यात उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:09 PM

सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.

ठळक मुद्देउन म्हणते मी : पारा ४३ अंशावर, जलपातळीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.विदर्भात सध्या उष्णतेची लाट आली आहे. जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ११ ते १५ एप्रिलपर्यंत ३६ ते ३८ अंश तापमानाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली होती. १५ एप्रिल रोजी पारा ४०.५ अंशावर जाऊन पोहोचला. १७ एप्रिलपासून तर तापमानाने कळस गाठणे सुरू केले. तीन दिवस पारा ४२.५ अंशावर स्थिर होता. गुरूवारी यवतमाळचे तापमान ४३ अंश नोंदविले गेले. शुक्रवारी तापमान ४२.५ अंश होते. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने नागरिक हैराण झाले आहे. वातावरणात अचानक शुष्कता निर्माण होऊन तापमान प्रचंड वाढले आहे. यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. या उन्हामुळे आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे.उन्हापासून बचाव करण्याचे प्रयत्न सर्वच जण करीत आहेत. मात्र यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई असल्याने कुलर काढण्याचीही सोय नाही. अनेकांनी कुलर काढले, परंतु पाणीच नसल्याने घामाच्या धारात भिजण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातही अशीच अवस्था निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानाचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र भूजल पातळी खालावली आहे. अशातच आता तापमान वाढत असल्याने ही पातळी आणखी खाली जात आहे. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांनी टाकला सिग्नलवर मंडपतळपत्या उन्हामुळे सिग्नलवर दोन मिनीट थांबणेही असह्य होते. यावर उपाय म्हणून एलआयसी चौकातील सिग्नलवर पोलीस दलाच्यावतीने चक्क ग्रीन शेड नेटचा मंडप टाकला आहे. चारही बाजूला ग्रीन शेड नेट आच्छादले असून यामुळे तात्पुरती सावली निर्माण होऊन वाहनधारकांना सिग्नलवर थांबणे सुसह्य होते. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाने उन्हाळा मात्र काहीसा सुसह्य होणार आहे. शहरातील विविध भागात काही दुकानदारांनीही आपल्या दुकानासमोर ग्रीन शेड नेटचे मंडप टाकले आहे.