शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या; डिसेंबर-जानेवारीत वाढणार थंडीचा आणखी कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:49 IST

वाऱ्याच्या दिशा बदलाचा परिणाम : बाष्पयुक्त समुद्री वाऱ्यामुळे तापमान कायम

यवतमाळ : जिल्ह्यातील रात्रीचे तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. मात्र, दिवसाच्या तापमानात अजूनही अपेक्षित घट झालेली नाही. पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

विदर्भासह जिल्ह्यात हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट होते. दिवसाही तापमान कमी होत जाते. यामुळे थंडीचा कडाका वाढत असतो. उत्तरेकडील वारे हिवाळा ऋतू आणतात. यंदा मात्र थोडी परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. पूर्व, पश्चिमेकडून येणारे वारेही वाहत आहे. दिवसा बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येतात. यामुळे दिवसाचे तापमान कमी होत नाही. तसेच काही भागांत पावसाची शक्यता निर्माण होते. याचा फटका थंडीला बसत आहे. गेल्या काही दिवसांंपासून तापमानात फेरबदल जाणवत असला तरी थंडीचा जोर अपेक्षेइतका वाढलेला नाही. चांगली थंडी रबीसाठी पुरक ठरणारी आहे.

दिवसाच्या वाऱ्यामुळे वातावरणावर परिणाम

जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहणे अपेक्षित आहे. आता मात्र समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहत आहे. याचा परिणाम दिवसाच्या तापमानावर होत आहे. रात्री उत्तरेकडील थंड वारे येतात. त्याने रात्री थंडी जाणवते. एकूणच पर्यावरणाची वेगवेगळ्या प्रकारे होत असलेली हानी या बदलाला कारणीभूत ठरत असल्याचे हवामान अभ्यासक डॉ. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

रब्बीच्या पिकांना हवा थंडीचा  बूस्ट

यंदा खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना नापिकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे रबी हंगामावरच आता सर्व भिस्त अवलंबून आहे. जिल्ह्यात प्राधान्याने गहू व हरभरा या पिकांची रबी हंगामात पेरणी केली जाते. यासोबतच खरिपातील तुरीलाही थंडीची गरज भासत असते. या थंडीमुळे उत्पन्नावरही चांगला परिणाम होतो.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान