शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या; डिसेंबर-जानेवारीत वाढणार थंडीचा आणखी कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:49 IST

वाऱ्याच्या दिशा बदलाचा परिणाम : बाष्पयुक्त समुद्री वाऱ्यामुळे तापमान कायम

यवतमाळ : जिल्ह्यातील रात्रीचे तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. मात्र, दिवसाच्या तापमानात अजूनही अपेक्षित घट झालेली नाही. पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

विदर्भासह जिल्ह्यात हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट होते. दिवसाही तापमान कमी होत जाते. यामुळे थंडीचा कडाका वाढत असतो. उत्तरेकडील वारे हिवाळा ऋतू आणतात. यंदा मात्र थोडी परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. पूर्व, पश्चिमेकडून येणारे वारेही वाहत आहे. दिवसा बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येतात. यामुळे दिवसाचे तापमान कमी होत नाही. तसेच काही भागांत पावसाची शक्यता निर्माण होते. याचा फटका थंडीला बसत आहे. गेल्या काही दिवसांंपासून तापमानात फेरबदल जाणवत असला तरी थंडीचा जोर अपेक्षेइतका वाढलेला नाही. चांगली थंडी रबीसाठी पुरक ठरणारी आहे.

दिवसाच्या वाऱ्यामुळे वातावरणावर परिणाम

जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहणे अपेक्षित आहे. आता मात्र समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहत आहे. याचा परिणाम दिवसाच्या तापमानावर होत आहे. रात्री उत्तरेकडील थंड वारे येतात. त्याने रात्री थंडी जाणवते. एकूणच पर्यावरणाची वेगवेगळ्या प्रकारे होत असलेली हानी या बदलाला कारणीभूत ठरत असल्याचे हवामान अभ्यासक डॉ. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

रब्बीच्या पिकांना हवा थंडीचा  बूस्ट

यंदा खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना नापिकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे रबी हंगामावरच आता सर्व भिस्त अवलंबून आहे. जिल्ह्यात प्राधान्याने गहू व हरभरा या पिकांची रबी हंगामात पेरणी केली जाते. यासोबतच खरिपातील तुरीलाही थंडीची गरज भासत असते. या थंडीमुळे उत्पन्नावरही चांगला परिणाम होतो.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान