शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कष्टिक पोशिंद्याच्या पोरांचेच पोट गेले खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही.

ठळक मुद्देकोरोनाने अनेकांचे ताट परावलंबी : साडेचार लाख शेतकऱ्यांवर २७ लाख लोकसंख्येचा भार, पण बेफाम जगणाऱ्यांना अन्नाच्या नासाडीची हौसच फार

 अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून तर एसी कारमधल्या कोट्यधीश उद्योजकापर्यंत साऱ्यांचाच दिवस उगवतो तो अन्नाच्या शोधात. कुणाला हात पसरावा लागतो, तर कुणाच्या घशात घास लोटावा लागतो.. पण ज्यांच्या कष्टातून अन्न उगवते, त्या शेतकऱ्यांच्या ताटातही यंदा तेलामिठाची सोय उरलेली नाही. कोरोनाने जगाला जेरीस आणले, थांबविले तेव्हा एकटा शेतकरी मात्र राबत होता. पण आता निसर्गाने त्याचाही घास हिरावलाय... शुक्रवारी जागतिक अन्न दिवस साजरा होत असताना पोशिंद्याच्या पोरांची अन्नान दशा मांडण्याचा हा प्रयत्न...उद्योगांची वाणवा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या २७ लाख लोकसंख्येच्या उदरभरणाचा जिम्मा प्रामुख्याने चार लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी शिरावर घेतला आहे. हजारो शेतमजुरांच्या चुली याच पोशिंद्याच्या आसऱ्याने पेटत आहेत. आता सरकारी अनास्थेने या अन्नदात्याच्याच पोरांचे पोट खपाटीला गेले आहे. मागच्या वर्षी तुरी विकलेल्या अनेक कास्तकांना अजूनही पैसे मिळाले नाही. कितीही राबराबले तरी कापसाला भाव मिळत नाही. यंदा कापूस टाळून सोयाबीन पेरले तर पेरलेलेही उगवले नाही. ४ एकरात सव्वाशे किलो बियाणे पेरले अन् उगवले केवळ ५० किलो... ही घाटंजीतील भयकारक परिस्थिती नुकतीच ह्यलोकमतह्णने उघडकीस आणली. रक्त आटवून अन्न पिकविणाऱ्यांचे हाल असताना, विलासी जगणाऱ्यांनी मात्र अन्नाची नासाडी चालविली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार भारतात ४० टक्के अन्न वाया जाते. तर १९ कोटी नागरिक कुपोषित आहेत. ही दुर्दैशा टाळण्यासाठी अन्नाच्या कणा-कणाचा उपयोग करणे आणि तो पिकविणाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे... सामान्य माणसाने व सरकारमधल्या असामान्य माणसानेही!चवदार मिरच्या, लिंबाचे पोते, महागाचे तांदूळ फेकण्यात कसली धन्यता ?मेहनतीने पिकविण्यात आलेल्या शेतमालाची सरकार किंमत करीत नाही अन् सामान्य माणसेही बावळटपणे तो माल फेकण्यात धन्यता मानतात. दुकानांमध्ये ह्यउतरवूनह्ण फेकलेल्या लिंबांचा, मिरच्यांचा पसारा यवतमाळच्या रस्त्यावर दिसतो. चवदार आणि आरोग्यदायक असलेली ही फळे केवळ अंधश्रद्धेपायी मातीमोल होतात. शहराचा विचार करता पोतंभर तरी माल असाच वाया जात आहे. लग्नसमारंभात तर ही उधळपट्टी मोठ्या प्रमाणात चालते. चुमडंभर महाग तांदळाच्या अक्षता फेकून नासविल्या जातात. तर बुफे जेवणात अर्धी भरलेली प्लेट डस्टबिनमध्ये निर्लज्जपणे टाकली जाते. कहर म्हणजे ह्यफोडणी जरा जमलीच नाहीह्ण असे ढेकर देत म्हणताना ना पोरीच्या बापाचा विचार होत नाही कास्तकाराचा!लॉकडाऊनमध्ये भलेभले अन्नाला मोतादकोरोनामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना भलेभले अन्नाला मोताद झाले होते. तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ करीत हजारो लोकांच्या तोंडात घास पोचविला. धान्याच्या किट वाटप केल्या. सारेच उद्योगधंदे, दुकाने बंद असताना एकमेव शेतकरीच असा होता, जो लॉकडाऊनमध्येही अन्न उगविण्याच्या कामात व्यग्र होता. कारण लॉकडाऊननंतर बाजार उघडेलही, लोकांच्या खिशात पैसा येईलही.. पण बाजारात धान्यच आले नाही, तर जगणार कोण? या प्रश्नाचे उत्तर अन्नदात्याच्या घामातच आहे.पोळीपेक्षा भाकरीवर जोर !एकेकाळी ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन होते. पण आता ज्वारीची लागवडच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पूर्वी केवळ गरिबांच्याच ताटात दिसणाऱ्या भाकरीची आता गर्भश्रीमंतांनाही पोळीपेक्षा अधिक आस लागली आहे. पण माणसांनाच नव्हेतर ढोरांनाही ज्वारीचा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. यासंदर्भात बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उत्पादनावर भर द्यावा. कपाशीपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न यातून मिळू शकते. जनावरांच्या घटत्या संख्येलाही त्यामुळे आधार मिळेल. शिवाय ज्वारीची भाकर व इतर पदार्थ आरोग्यालाही पोषक आहेत. खाद्यतेलाची आयात करण्यामुळे देशाला बराच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलवर्गीय पिकांची लागवड वाढवावी. विशेषत: तुरीला आता ६ हजारांचा हमीभाव जाहीर झाला आहे. रब्बीत करडई, जवस, तसेच उन्हाळी तिळाची लागवड फायदेशीर ठरू शकते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती