शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला, ‘मजुरी’ एक कहानी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.

ठळक मुद्देजीवनाकडे धावताना मृत्यूने गाठले : आर्णीच्या अपघातात स्थलांतरित चार मजुरांचा अंत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना अक्षरश: काळ बनून आला आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असला तरी आता कोरोनाच्या संक्रमणाआधी नुसत्या भयाने मृत्यूसंख्या वाढत आहे. संक्रमण टाळण्यासाठी मजुरांना अडविण्यात आले, मग सोडण्यात आले... मृत्यू टाळून आपले मूळगाव गाठून आनंदाने जगण्यासाठी हे मजूर धावत सुटले. मात्र अर्ध्यातच त्यांना मृत्यूने गाठले. मजुरी करून पोटात दोन घास टाकण्याची सोय व्हावी म्हणून घरापासून हजारो किलोमीटर लांब आलेल्या या कष्टकरी जीवांना अखेर अर्ध्यातच जीवनाचा डाव मोडावा लागला.मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सोलापूरमधील मजुरांना घेऊन एसटी बस (क्र.एमएच-१४-बीटी-४६५१) सोमवारी रात्री झारखंडकडे निघाली. सोलापूर ते यवतमाळ हे अंतर कापता-कापता पहाट झाली. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता आर्णीजवळच्या कोळवण गावानजीक या बसचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार जण ठार झाले. बस चालक सुनील शिंदे, अनुज मांजी, सुनीता शाहू, शशीलता यादव यांचा मृतकात समावेश आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाले.पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोक झारखंड, छत्तीसगड सारख्या राज्यातून महाराष्ट्रात आले होते. घरापासून एवढ्या दूर येऊन त्यांना काही क्लासवन ऑफीसरचा पगार नव्हता. दिवसभर राबणे आणि रात्री पालावरच दोन घास खाणे, सकाळी उठून पुन्हा राबणे हाच त्यांचा रतीब होता. पण श्रीमंतांनी देशात आणलेल्या कोरोनामुळे या गरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले. देशात लॉकडाऊन सुरू झाले. मजुरांचे काम गेले अन् गावाकडे जावे तर सरकारने रस्तेच बंद केले. तब्बल दोन महिने उपाशी-तापाशी, परगावात उपऱ्यासारखे जगल्यानंतर सरकारने उपकार म्हणून या मजुरांना मूळगावात जाण्याची परवानगी दिली. सोलापूरचे हे मजूर कसेही करून घर गाठावे म्हणून सोमवारी रात्री एसटी बसमध्ये चढले. पण घर शेकडो मैल दूर असतानाच मध्येच जग सोडून गेले. त्यांच्या आर्त किंकाळ्या सरकारच्या कानठळ्या बसविणाºया होत्या. पण सरकारपर्यंत त्या पोहोचल्या नाही. मरणाऱ्यांच्या हाका फक्त आर्णीतील संवेदनशील माणसांंनीच ऐकल्या आणि तेच मदतीसाठी धावत गेले. पण मृत्यूचा वेग आर्णीकरांपेक्षाही जास्त होता.एसटी चालकाला दिवसभराचा ताण अन् पहाटेची डुलकीस्थलांतरित मजुरांचा जीव घेणारा हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. सध्या आर्णीनजीक या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील दिलीप बिल्डकॉन कंपनीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे. कंपनीचे ट्रक, टिप्पर वाटेल तसे रस्त्यावरच उभे केले जात आहे. लॉकडाऊन असल्याने फारशी वाहतूक राहणार नाही म्हणून या कंपनीचा एक टिप्पर कोळवण गावाजवळ चक्क महामार्गावरच उभा करून ठेवण्यात आला. नेमक्या याच उभ्या टिप्परवर सोलापूरकडून आलेली मजुरांची भरधाव बस धडकली. सोलापूरमधून बस घेऊन निघालेला बसचालक रात्रभर बस चालवित होता. त्यामुळे झोपेचा साहाजिकच ताण होता. शिवाय लॉकडाऊनमुळे आपल्या नोकरीचे काय हा ताणही प्रत्येक महामंडळ कर्मचाºयाच्या डोक्यावर आहेच. त्यातच पहाटे-पहाटे झोपेची डुलकी असह्य झाली आणि बस उभ्या टिप्परला भिडली. घरी पोहोण्याचे स्वप्न भंगले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात