शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला, ‘मजुरी’ एक कहानी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.

ठळक मुद्देजीवनाकडे धावताना मृत्यूने गाठले : आर्णीच्या अपघातात स्थलांतरित चार मजुरांचा अंत

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना अक्षरश: काळ बनून आला आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असला तरी आता कोरोनाच्या संक्रमणाआधी नुसत्या भयाने मृत्यूसंख्या वाढत आहे. संक्रमण टाळण्यासाठी मजुरांना अडविण्यात आले, मग सोडण्यात आले... मृत्यू टाळून आपले मूळगाव गाठून आनंदाने जगण्यासाठी हे मजूर धावत सुटले. मात्र अर्ध्यातच त्यांना मृत्यूने गाठले. मजुरी करून पोटात दोन घास टाकण्याची सोय व्हावी म्हणून घरापासून हजारो किलोमीटर लांब आलेल्या या कष्टकरी जीवांना अखेर अर्ध्यातच जीवनाचा डाव मोडावा लागला.मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही थांगपत्ता नसताना त्यांचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सोलापूरमधील मजुरांना घेऊन एसटी बस (क्र.एमएच-१४-बीटी-४६५१) सोमवारी रात्री झारखंडकडे निघाली. सोलापूर ते यवतमाळ हे अंतर कापता-कापता पहाट झाली. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता आर्णीजवळच्या कोळवण गावानजीक या बसचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार जण ठार झाले. बस चालक सुनील शिंदे, अनुज मांजी, सुनीता शाहू, शशीलता यादव यांचा मृतकात समावेश आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाले.पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोक झारखंड, छत्तीसगड सारख्या राज्यातून महाराष्ट्रात आले होते. घरापासून एवढ्या दूर येऊन त्यांना काही क्लासवन ऑफीसरचा पगार नव्हता. दिवसभर राबणे आणि रात्री पालावरच दोन घास खाणे, सकाळी उठून पुन्हा राबणे हाच त्यांचा रतीब होता. पण श्रीमंतांनी देशात आणलेल्या कोरोनामुळे या गरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले. देशात लॉकडाऊन सुरू झाले. मजुरांचे काम गेले अन् गावाकडे जावे तर सरकारने रस्तेच बंद केले. तब्बल दोन महिने उपाशी-तापाशी, परगावात उपऱ्यासारखे जगल्यानंतर सरकारने उपकार म्हणून या मजुरांना मूळगावात जाण्याची परवानगी दिली. सोलापूरचे हे मजूर कसेही करून घर गाठावे म्हणून सोमवारी रात्री एसटी बसमध्ये चढले. पण घर शेकडो मैल दूर असतानाच मध्येच जग सोडून गेले. त्यांच्या आर्त किंकाळ्या सरकारच्या कानठळ्या बसविणाºया होत्या. पण सरकारपर्यंत त्या पोहोचल्या नाही. मरणाऱ्यांच्या हाका फक्त आर्णीतील संवेदनशील माणसांंनीच ऐकल्या आणि तेच मदतीसाठी धावत गेले. पण मृत्यूचा वेग आर्णीकरांपेक्षाही जास्त होता.एसटी चालकाला दिवसभराचा ताण अन् पहाटेची डुलकीस्थलांतरित मजुरांचा जीव घेणारा हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. सध्या आर्णीनजीक या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील दिलीप बिल्डकॉन कंपनीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे. कंपनीचे ट्रक, टिप्पर वाटेल तसे रस्त्यावरच उभे केले जात आहे. लॉकडाऊन असल्याने फारशी वाहतूक राहणार नाही म्हणून या कंपनीचा एक टिप्पर कोळवण गावाजवळ चक्क महामार्गावरच उभा करून ठेवण्यात आला. नेमक्या याच उभ्या टिप्परवर सोलापूरकडून आलेली मजुरांची भरधाव बस धडकली. सोलापूरमधून बस घेऊन निघालेला बसचालक रात्रभर बस चालवित होता. त्यामुळे झोपेचा साहाजिकच ताण होता. शिवाय लॉकडाऊनमुळे आपल्या नोकरीचे काय हा ताणही प्रत्येक महामंडळ कर्मचाºयाच्या डोक्यावर आहेच. त्यातच पहाटे-पहाटे झोपेची डुलकी असह्य झाली आणि बस उभ्या टिप्परला भिडली. घरी पोहोण्याचे स्वप्न भंगले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात