शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती अर्धा टक्का

By admin | Published: July 12, 2017 12:28 AM

जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देऊनही राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्जवाटपातील गेल्या दोन आठवड्यातील प्रगती अवघी अर्धा टक्का पुढे सरकली आहे.

दोन आठवड्यातील कर्जवाटप : लाखो शेतकरी अखेर सावकारांच्या दारी रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देऊनही राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्जवाटपातील गेल्या दोन आठवड्यातील प्रगती अवघी अर्धा टक्का पुढे सरकली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांवर सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पेरणीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली तरीही थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख शेतकऱ्यांना अखेर सावकारचे उंबरठे झिजवावे लागले. त्यावरच ९२ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. दुसरीकडे अद्यापही कर्जमाफीच्या आदेशाची अंमलबजावणी बँकांनी केलीच नाही. त्यात जिल्हा बँकेकडे पैसा नाही. राष्ट्रीयकृत बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सूचना नाही आणि ग्रामीण बँकांनी केवळ ३५८ लोकांना १० हजारांची मदत दिली आहे. कर्जमाफीच्या यादीत दोन लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. तथापि या शेतकऱ्यांसमोर जाचक निकषांमुळे आडकाठी निर्माण झाली. गेल्या गत सव्वा महिन्यात ११ दिवस पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱ्यांनी बँकांच्या शेकडो येरझारा मारल्या. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिणामी तीन लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे.