शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

यवतमाळात ‘चक्रीधरणे’त शेतकऱ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:39 AM

शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदारांचे नेतृत्व पाच दिवसांपासून शासनाविरोधी एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या नाकर्तेपणाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळात पाच दिवसांपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. दररोज अभिनव पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व मंगळवारी हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी केले.शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात यवतमाळच्या तिरंगा चौकात शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी शासनविरोधात एल्गार पुकारला आहे. दररोज एका विधानसभा क्षेत्रातील शेतकरी तिरंगा चौकात एकत्र येऊन आंदोलन करीत आहे. मंगळवारी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांना तसेही अर्धनग्न केले आहे. उद्धस्त झालेल्या या शेतकऱ्यांनी शर्ट आणि बनियान काढून केवळ पँट घालून हे आंदोलन केले. यावेळी खासदार राजीव सातव, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते राम देवसरकर, शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, अशोक भुतडा, शिवाजी सवनेकर, अविनाश काकडे, दिनेश गोगरकर, रमेश चव्हाण, नंदु अग्रवाल, सलीम सिद्धीकी, शैलेश कोपरकर, सोनू खातीब, शैलेश अनखुळे, बाबू दुर्गमवार, स्वप्नील नाईक, बालाजी आगलावे, अरविंद माने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.शिवसेना-भाजपा युती सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना पोत्यावर आणले, असे म्हणत आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी अंगात पोत्यांचा सदरा घालून आणि गळ्यात अळीग्रस्त बोंडांच्या माळा घातल्या. हातात बेशरमचे झाड उंचावून सरकारचा निषेध केला.दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आंदोलन घेण्यात आले. सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त नाही. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून सरकारच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त संचारावे आणि शेतकरी मदतीची भावना निर्माण व्हावी, ही यामागची भूमिका होती. तिसऱ्या दिवशी मुंडण करून शासनाचा निषेध केला, तर चौथ्या दिवशी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी शासनविरोधी टाहो फोडला. गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची अद्याप शासनाने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करून राज्यभर पोहोचविण्याचा निर्धार शेतकरी संघर्ष समितीने केला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी