शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बाभूळगावातील घारफळ, सरुळ परिसराला गारपिटीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 21:28 IST

गहू, हरभऱ्याचे नुकसान : सकाळपासून ढगाळी वातावरण

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ परिसराला शनिवारी सायंकाळी गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सकाळपासूनच परिसरात ढगाळी वातावरण होते. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच गारा बरसल्या. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, सरुळ, परसोडी, शिंदी, पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, एरंडगाव, वडगाव, मुबारकपूर, किन्ही, गोंधळी, गवंडी, महमदपूर आदी गावांना गारांनी झोडपले. शेतात गेलेले शेतकरी, शेतमजूरही यात सापडले.

खरीप हंगामात आलेली पिकांची तूट रब्बी हंगामात भरून निघावी म्हणून सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी पीक घेतले. ही पिके काढणीवर आलेली असतानाच परिसरातील काही गावांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतशिवारातील उभी पिके वादळीवारा व गारपिटीने जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरुळ परिसरातही गारपीटीने शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान केले आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :Rainपाऊस