शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वाढणारे वाघ अन् घटणारे जंगल हेच संघर्षाचे मूळ - डाॅ. रमजान विराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:35 IST

वन्यजीव संवर्धनात स्थानिकांचा सहभाग वाढवा

यवतमाळ : जिल्ह्यात वाढत चाललेली वाघांची संख्या आणि त्या तुलनेत घटत चाललेले जंगल, याच कारणातून मानव-वन्यजीव संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन शासनाने वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मानद वन्यजीव अभ्यासक डाॅ. रमजान विराणी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात सध्या वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गेल्या २० वर्षांतील वन्यजीव संवर्धनाच्या कामातील आपल्या अनुभवातून डाॅ. विराणी यांनी वनवैभव आणि जैवविविधता जपण्यासाठी काही पर्याय सूचविले आहेत. ते म्हणाले की, वन्यजीवांच्या कायमस्वरूपी व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून संवंर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना सामील करून घेणे आवश्यक आहे. जंगल, पाणथळ क्षेत्रे अशी वन्यजीवांच्या वास्तव्याची ठिकाणे मोठ्या क्षेत्रात विखुरलेली असतात. त्यांचे संरक्षण-संवर्धन स्थानिक गावकरी चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशा विस्तीर्ण प्रदेशांमध्ये वनविभागाचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी वर्षाच्या सर्व ऋतूमध्ये पोहोचणे शक्य नाही. म्हणून जंगलतोड, शिकार, अतिक्रमणे होताना आढळतात.

डाॅ. विराणी म्हणाले की, वन्यजीव संवर्धनाची संकल्पना आजकाल फॅशन झाली आहे. व्हाॅटसअॅप, फेसबुकचा वापर करून नाना प्रकारचे फोटो व्हायरल करण्याची चढाओढ सुरू आहे. परंतु, जोपर्यंत स्थानिकांचा प्रत्यक्ष कामात सहभाग नोंदविला जात नाही, तोपर्यंत वनव्यवस्थापन होणे शक्य नाही. जसे की, टिपेश्वर अभयारण्यामध्ये मागील १०-१२ वर्षापासून वाघांसाठीचा चांगला अधिवास निर्माण झाल्याने तिथे वाघांच्या प्रजननासाठी चांगले क्षेत्र तयार झाले आहे.

परंतु वाघ क्षेत्र निश्चित करून राहणारा प्राणी आहे. त्यामुळे ६-७ वाघांपेक्षा जास्त वाघ या क्षेत्रामध्ये वास्तव्य करू शकत नाही. त्यांचे पौगंडावस्थेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये स्थलांतर होते. परंतु दरम्यानच्या काळात २००६ च्या वनहक्क कायद्याचा आधार घेऊन जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आढळतात. वाढणारी व्याघ्रसंख्या व कमी होत गेलेले जंगल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. तो कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच उपाय केले पाहिजेत.

या कार्यक्रमांची होऊ शकते मदत

वन्यजीव संरक्षणाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांना विविध कार्यक्रमांद्वारे जागृत केले जाऊ शकते. वन्यजीव संवर्धनाचे मूल्य रुजविणारे कार्यक्रम त्यासाठी आयोजित केले जावे. अशा कार्यक्रमांतून, माहितीतून स्थानिकांसाठी उपजीविकेच्या साधनांचीही निर्मिती होऊ शकते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सामूहिक वनहक्क, पेसा, श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आदी योजना आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांना नवसंजीवनी देऊन त्यात जास्तीत जास्त स्थानिकांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे डाॅ. रमजान विराणी म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणYavatmalयवतमाळ