शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाढणारे वाघ अन् घटणारे जंगल हेच संघर्षाचे मूळ - डाॅ. रमजान विराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:35 IST

वन्यजीव संवर्धनात स्थानिकांचा सहभाग वाढवा

यवतमाळ : जिल्ह्यात वाढत चाललेली वाघांची संख्या आणि त्या तुलनेत घटत चाललेले जंगल, याच कारणातून मानव-वन्यजीव संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन शासनाने वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मानद वन्यजीव अभ्यासक डाॅ. रमजान विराणी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात सध्या वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गेल्या २० वर्षांतील वन्यजीव संवर्धनाच्या कामातील आपल्या अनुभवातून डाॅ. विराणी यांनी वनवैभव आणि जैवविविधता जपण्यासाठी काही पर्याय सूचविले आहेत. ते म्हणाले की, वन्यजीवांच्या कायमस्वरूपी व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून संवंर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना सामील करून घेणे आवश्यक आहे. जंगल, पाणथळ क्षेत्रे अशी वन्यजीवांच्या वास्तव्याची ठिकाणे मोठ्या क्षेत्रात विखुरलेली असतात. त्यांचे संरक्षण-संवर्धन स्थानिक गावकरी चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशा विस्तीर्ण प्रदेशांमध्ये वनविभागाचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी वर्षाच्या सर्व ऋतूमध्ये पोहोचणे शक्य नाही. म्हणून जंगलतोड, शिकार, अतिक्रमणे होताना आढळतात.

डाॅ. विराणी म्हणाले की, वन्यजीव संवर्धनाची संकल्पना आजकाल फॅशन झाली आहे. व्हाॅटसअॅप, फेसबुकचा वापर करून नाना प्रकारचे फोटो व्हायरल करण्याची चढाओढ सुरू आहे. परंतु, जोपर्यंत स्थानिकांचा प्रत्यक्ष कामात सहभाग नोंदविला जात नाही, तोपर्यंत वनव्यवस्थापन होणे शक्य नाही. जसे की, टिपेश्वर अभयारण्यामध्ये मागील १०-१२ वर्षापासून वाघांसाठीचा चांगला अधिवास निर्माण झाल्याने तिथे वाघांच्या प्रजननासाठी चांगले क्षेत्र तयार झाले आहे.

परंतु वाघ क्षेत्र निश्चित करून राहणारा प्राणी आहे. त्यामुळे ६-७ वाघांपेक्षा जास्त वाघ या क्षेत्रामध्ये वास्तव्य करू शकत नाही. त्यांचे पौगंडावस्थेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये स्थलांतर होते. परंतु दरम्यानच्या काळात २००६ च्या वनहक्क कायद्याचा आधार घेऊन जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आढळतात. वाढणारी व्याघ्रसंख्या व कमी होत गेलेले जंगल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. तो कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच उपाय केले पाहिजेत.

या कार्यक्रमांची होऊ शकते मदत

वन्यजीव संरक्षणाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांना विविध कार्यक्रमांद्वारे जागृत केले जाऊ शकते. वन्यजीव संवर्धनाचे मूल्य रुजविणारे कार्यक्रम त्यासाठी आयोजित केले जावे. अशा कार्यक्रमांतून, माहितीतून स्थानिकांसाठी उपजीविकेच्या साधनांचीही निर्मिती होऊ शकते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सामूहिक वनहक्क, पेसा, श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आदी योजना आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांना नवसंजीवनी देऊन त्यात जास्तीत जास्त स्थानिकांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे डाॅ. रमजान विराणी म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणYavatmalयवतमाळ