शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाढणारे वाघ अन् घटणारे जंगल हेच संघर्षाचे मूळ - डाॅ. रमजान विराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:35 IST

वन्यजीव संवर्धनात स्थानिकांचा सहभाग वाढवा

यवतमाळ : जिल्ह्यात वाढत चाललेली वाघांची संख्या आणि त्या तुलनेत घटत चाललेले जंगल, याच कारणातून मानव-वन्यजीव संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन शासनाने वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मानद वन्यजीव अभ्यासक डाॅ. रमजान विराणी यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात सध्या वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गेल्या २० वर्षांतील वन्यजीव संवर्धनाच्या कामातील आपल्या अनुभवातून डाॅ. विराणी यांनी वनवैभव आणि जैवविविधता जपण्यासाठी काही पर्याय सूचविले आहेत. ते म्हणाले की, वन्यजीवांच्या कायमस्वरूपी व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून संवंर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना सामील करून घेणे आवश्यक आहे. जंगल, पाणथळ क्षेत्रे अशी वन्यजीवांच्या वास्तव्याची ठिकाणे मोठ्या क्षेत्रात विखुरलेली असतात. त्यांचे संरक्षण-संवर्धन स्थानिक गावकरी चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशा विस्तीर्ण प्रदेशांमध्ये वनविभागाचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी वर्षाच्या सर्व ऋतूमध्ये पोहोचणे शक्य नाही. म्हणून जंगलतोड, शिकार, अतिक्रमणे होताना आढळतात.

डाॅ. विराणी म्हणाले की, वन्यजीव संवर्धनाची संकल्पना आजकाल फॅशन झाली आहे. व्हाॅटसअॅप, फेसबुकचा वापर करून नाना प्रकारचे फोटो व्हायरल करण्याची चढाओढ सुरू आहे. परंतु, जोपर्यंत स्थानिकांचा प्रत्यक्ष कामात सहभाग नोंदविला जात नाही, तोपर्यंत वनव्यवस्थापन होणे शक्य नाही. जसे की, टिपेश्वर अभयारण्यामध्ये मागील १०-१२ वर्षापासून वाघांसाठीचा चांगला अधिवास निर्माण झाल्याने तिथे वाघांच्या प्रजननासाठी चांगले क्षेत्र तयार झाले आहे.

परंतु वाघ क्षेत्र निश्चित करून राहणारा प्राणी आहे. त्यामुळे ६-७ वाघांपेक्षा जास्त वाघ या क्षेत्रामध्ये वास्तव्य करू शकत नाही. त्यांचे पौगंडावस्थेत आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये स्थलांतर होते. परंतु दरम्यानच्या काळात २००६ च्या वनहक्क कायद्याचा आधार घेऊन जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आढळतात. वाढणारी व्याघ्रसंख्या व कमी होत गेलेले जंगल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. तो कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच उपाय केले पाहिजेत.

या कार्यक्रमांची होऊ शकते मदत

वन्यजीव संरक्षणाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांना विविध कार्यक्रमांद्वारे जागृत केले जाऊ शकते. वन्यजीव संवर्धनाचे मूल्य रुजविणारे कार्यक्रम त्यासाठी आयोजित केले जावे. अशा कार्यक्रमांतून, माहितीतून स्थानिकांसाठी उपजीविकेच्या साधनांचीही निर्मिती होऊ शकते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सामूहिक वनहक्क, पेसा, श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आदी योजना आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांना नवसंजीवनी देऊन त्यात जास्तीत जास्त स्थानिकांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे डाॅ. रमजान विराणी म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणYavatmalयवतमाळ